‘सुशांतसिंह प्रकरणातून भाजपने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केले आहे त्यामुळे जनता तुम्हाला माफ करणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचना देखील न्यायालयानं केल्या आहेत.यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तर राज्यातील विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.
आधी 'कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर 'मेरा अंगण मेरा रणांगण' या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं.
'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.'— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 19, 2020
दरम्यान आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे, ‘ आधी ‘कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर ‘मेरा अंगण मेरा रणांगण’ या घोषणेतून तर आता सुशांत सिंह प्रकरणातून भाजपाने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं. ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.’ असे ते म्हणाले आहेत.
सीबीआयकडे प्रकरण गेल्याने मुंबई पोलिसांचा तपासावरही अनेकांनी प्रश्न उपस्थित केल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना पवार म्हणाले.’ सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं हे बरं झालं. पण यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’.’