मुंबई: मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. गेल्या २ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून आत्तापर्यंत पावसाने अनेक जीव घेतलेले आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३० जणांचे बळी घेतले. एकूण ११ ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनेनंतर विरोधकांनाही सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून विरोधकांनाच खडेबोल सुनावल्यानंतर मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
हे पण वाचा: राज ठाकरे एकटे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाहीत – चंद्रकांत पाटील
यावरून मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. ‘जसा बेस्ट “शी.एम” चा सर्वे केला तसा बेस्ट महापालिकेचा सर्वे केला तर त्याच्यात सुद्धा मुंबई महापालिका पहिली येईल.मुंबईकरांची एव्हढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण सामना मध्ये हेडलाईन येईल “आमचीच लाल आमचीच लाल” ‘ असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
जसा बेस्ट "शी.एम" चा सर्वे केला तसा बेस्ट महापालिकेचा सर्वे केला तर त्याच्यात सुद्धा मुंबई महापालिका पहिली येईल.मुंबईकरांची एव्हढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण सामना मध्ये हेडलाईन येईल"आमचीच लाल आमचीच लाल"
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 19, 2021
हे पण वाचा: पवारांनी एनडीए’त यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं – रामदास आठवले
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल
पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो. १७ जुलैच्या मध्यरात्री मुंबईत दुर्घटनांची ‘दरड’ कोसळली ती अनैसर्गिक पावसामुळेच. मुंबईत पावसाने काही झाले की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटे मोडणाऱ्यांनीही हे लक्षात घेतले पाहिजे”, असं म्हणत शिवसेनेनं विरोधकांना खडेबोल सुनावले.
हे पण वाचा: “लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत”
मुंबईत कुठे कुठे दुर्घटना?
शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३० जणांचे बळी घेतले. एकूण ११ ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यातील मोठी दुर्घटना चेंबूरमध्ये घडली. मुसळधार पावसाच्या रेट्यामुळे चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये एका घटनेत दरड तर दुसऱ्या घटनेत संरक्षक भिंत घरांवर कोसळली.
या दोन्ही दुर्घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीची साखरझोप या जीवांसाठी काळझोपच ठरली. भांडुपमध्ये अमरकोट भागात वनविभागाची संरक्षक भिंत कोसळून सोहम थोरात या १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात शिरलेले पाणी बाहेर काढत असतानाच डोंगरावरचे दगड आणि माती सोहमसाठी ‘यमदूत’ बनून आली.
विक्रोळीमध्येही एक दुमजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ११ ते पहाटे ३ या केवळ चार तासांत सर्वाधिक पाऊस कोसळला. एवढ्या कमी वेळात प्रचंड पाऊस कोसळल्याने चेंबूर आणि विक्रोळीतील दुर्घटना घडल्या हे उघड आहे. प्रचंड पाऊस आणि पाण्याचा रेटा यामुळे दरड खचली. संरक्षक भिंती कोसळल्या. चेंबूर येथील दुर्घटनाग्रस्त वसाहत डोंगराच्या पायथ्याशीच आहे.