मुंबई: शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३० जणांचे बळी घेतले. एकूण ११ ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यातील मोठी दुर्घटना चेंबूरमध्ये घडली. मुसळधार पावसाच्या रेट्यामुळे चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये एका घटनेत दरड तर दुसऱ्या घटनेत संरक्षक भिंत घरांवर कोसळली. यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तसेच जखमी झाले. यावरून विरोधकांनी महापालिकेवर सडकून टीका केली आहे. आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
हे पण वाचा: राज ठाकरे एकटे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाहीत – चंद्रकांत पाटील
मुंबईत लोक पावसामुळे मेली तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर, अशी बोचरी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी या सदंर्भात एक ट्विट केलं आहे. मुंबई शहरात रेस्क्यू टीम स्पॉटवर टेवा. तसेच अतिधोकादायक इमारती, डोंगराळ भागातील रहिवाशांचे लवकरात लवकर स्थलांतर करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील आपात्कालीन विभागातील अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.
हे पण वाचा: पवारांनी एनडीए’त यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं – रामदास आठवले
मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मा.मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर..@OfficeofUT pic.twitter.com/3b0dkBHZlc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 18, 2021
मुंबईत कुठे कुठे दुर्घटना?
शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईतील वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये ३० जणांचे बळी घेतले. एकूण ११ ठिकाणी घरे, घरांच्या भिंती, दरड किंवा संरक्षक भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यातील मोठी दुर्घटना चेंबूरमध्ये घडली. मुसळधार पावसाच्या रेट्यामुळे चेंबूरच्या आरसीएफ परिसरातील भारत नगरमध्ये एका घटनेत दरड तर दुसऱ्या घटनेत संरक्षक भिंत घरांवर कोसळली.
हे पण वाचा: मोठी बातमी : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल
या दोन्ही दुर्घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. मध्यरात्रीची साखरझोप या जीवांसाठी काळझोपच ठरली. भांडुपमध्ये अमरकोट भागात वनविभागाची संरक्षक भिंत कोसळून सोहम थोरात या १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घरात शिरलेले पाणी बाहेर काढत असतानाच डोंगरावरचे दगड आणि माती सोहमसाठी ‘यमदूत’ बनून आली.
विक्रोळीमध्येही एक दुमजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री ११ ते पहाटे ३ या केवळ चार तासांत सर्वाधिक पाऊस कोसळला. एवढ्या कमी वेळात प्रचंड पाऊस कोसळल्याने चेंबूर आणि विक्रोळीतील दुर्घटना घडल्या हे उघड आहे. प्रचंड पाऊस आणि पाण्याचा रेटा यामुळे दरड खचली. संरक्षक भिंती कोसळल्या. चेंबूर येथील दुर्घटनाग्रस्त वसाहत डोंगराच्या पायथ्याशीच आहे.