सातारा : सातारा हद्दवाढीला मान्यता मिळाल्यावर आता सातारा महानगरपालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यावर सातारा नगराध्यक्षा माधवी कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे’
सातारा शहराचा सर्वांगिण विकास उदयनराजे भोसले यांचे नेतृत्वाखाली केला जाईल. शहराचे अस्तित्व अधिक नियोजनबध्द साकारण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने उपाय योजले जातील, असे मत सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम आणि उपाध्यक्षा किशोर शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केले आहे.
सातारा शहरात प्रवेश करताना, ग्रामपंचायत हद्दीत आणि त्रिशंकू भागातील कच-याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रस्ते, गटर, पाणी, दिवाबती आदी सुविधांसह आता जुने आणि नवीन समाविष्ट नागरीक यांच्या सर्वांगिण विकासाकरीता उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबध्द प्रयत्न केले जातील, असेही नगराध्यक्षा व उपाध्यक्ष यांनी नमुद केले आहे.
सातारा शहराची हद्दवाढ 1977 पासून प्रलंबित होती. मात्र, 1997-98 मध्ये नव्याने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यास अनेक कारणाने अडथळे निर्माण होत होते. हद्दवाढीच्या 1997-98 पासून भिजत पडलेल्या या प्रश्नाला सर्वप्रथम वाचा फोडण्याचे काम सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. त्याला आज यश आले असून एक चांगली घटना घडली आहे.
Read Also