निधीवाटपांवरून काँग्रेसचे अनेक आमदार नाराज असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळत सुरु आहे यावरून आता भाजपचे खासदार सुजय विखे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली, मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल असे विखे म्हणाले.
काँग्रेस चौथ्या नंबरचा पक्ष असून त्यांना लॉटरी लागली आहे. मात्र तरीही त्यांचे तिकीट कोणी फाडत नाही, असा टोलाही विखेंनी यावेळी लगावला. तीन पक्षांच्या सरकारमध्ये सर्वांचे समाधान करणे अवघड असते. तसेच ज्या खात्याचा मंत्री त्याच पक्षाचे काम होते. त्यामुळे बाकीचे नाराज होतात. हे सर्व स्वार्थासाठी एकत्र आले आहेत असा घणाघात देखील यावेळी विखे यांनी महाविकास आघाडीवर केला.
महाराष्ट्राचा विकास थांबेल त्यांचा जो काही अंतर्गत प्रश्न आहे तो त्यांनी सोडवून घ्यावा. तसेच आता एका पक्षाची नाराजी बाहेर आली आहे. मात्र पुढच्या काळात सर्वच पक्षाची नाराजी बाहेर येईल,” अशी भविष्यवाणी खासदार सुजय विखे यांनी केली आहे. या सरकारमध्ये मंत्री समाधानी आहेत मात्र आमदार नाराज असल्याचे देखील विखेंनी यावेळी सांगितले.
Also Read This
‘ई-पासचं औचित्यच संपलय ! राज्य सरकारच्या धोरणांमध्ये गोंधळ आणि विसंगती दिसून येतhttps://t.co/ErM8NUKvEm@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 26, 2020