जकीय फायद्यासाठी आता या प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे. महाराष्ट्र पोलिस या प्रकरणाची योग्यप्रकारे चौकशी करीत आहेत. सत्याच्या मुळाशी जाण्यास ते सक्षम आहेत. या प्रकरणात पोलिसांचा दुर्लक्ष होत नसल्याचंही गृहमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून सांगितलं की, सुशांत सिंह राजपूतने कथित आत्महत्या केली आहे. मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेनं सुरू आहे. मुंबई पोलिसांनी याआधीच या प्रकरणाशी संबंधित आरोपांची तपासणी करत आहेत. पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे बिहार पोलिस मुंबईत चौकशी करत आहेत. बिहार पोलिस भादंवि कलम 12 आणि 13 अंतर्गत चौकशी करत आहे. ही चौकशी कार्यक्षेत्रातील पोलिस व कोर्टाद्वारे खटला चालविला जावा, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
सिंह म्हणाले, मुंबई पोलीस बॉलिवूडमधल्या दिग्गजांचा तपास करत आहे. मात्र हा तपास म्हणजे फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी केला जात आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात साधा FIR सुद्धा दाखल केलेला नाही. तपास कुणाचा आणि नेमका काय केला जात आहे ते सुद्धा सांगितलेलं नाही. पाटना पोलिसांनी FIR दाखल केल्यानंतरच या प्रकरणी खरा तपास सुरु झाल्याचंही ते म्हणाले.