सुशांत सिंह प्रकरणाचा सध्या सीबीआयकडून कसून तपास सुरु आहे. या प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन खुलासे होत असताना आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यासंबंधी अजून एक महत्वाची मागणी केली आहे. भातखळकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा सीबीआयने तपास करावा अशी मागणी भातखळकर यांनीच सुरुवातीला या लावून धरली होती.त्यानंतर आता यासंबंधीच्या मुंबई पोलिसांबाबत त्यांनी एक ट्विट करत महत्वाची मागणी केली आहे.
काय म्हणालेत भातखळकर नेमकं आपल्या ट्विटमध्ये
सुशांत सिंह तपास प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि DCP त्रिमुखे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे आता उघड होते आहे.
घटनेचे कलम 311 वापरून परमबीर यांची हकालपट्टी करावी अशी विनंती या ट्विटद्वारे भातखळकर यांनी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या मागणीचे एक पत्र पाठवले असल्याचे सांगितले आहे.
परमबीर यांना हाकला…
सुशांत सिंह तपास प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि DCP त्रिमुखे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे आता उघड होते आहे.
घटनेचे कलम 311 वापरून परमबीर यांची हकालपट्टी करावी अशी विनंती मी मा. पंतप्रधान @narendramodi यांना केली आहे. pic.twitter.com/xgOFgqlt4A— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 27, 2020
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणातील प्रमुख संशयित, सुशांतची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्तीभोवती आता ईडी, सीबीआयबरोबरच केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण पथकाने (एसीबी) चौकशीचा फास आवळला आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात तपासादरम्यान रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रियाने सुशांतचे घर सोडण्याआधी एका आयटी प्रोफेशनलकडून 8 हार्ड डिस्कमधला डेटा डिलीट करून घेतला होता अशी माहिती समोर आली आहे.