नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यावरून शेतकरी केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहे. अनेकदा चर्चा करून अद्याप यासंदर्भात कोणताही तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर बोलताना जनतेने अशाच बदलांसाठी मोदी सरकारला पुन्हा बहुतमना निवडून दिले असल्याचे, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.
तोमर म्हणाले की, दी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातही नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर कायद्यासारखे (GST) निर्णय घेण्यात आले. तेव्हा या निर्णयांना विरोध झाला. मात्र, हे निर्णय आमुलाग्र बदल करणारे आणि 2019 साली भाजपला आणखी भक्कम बहुमत मिळवून दिले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या कार्यकाळात अनेक सुधारणा केल्या. नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयानंतर सरकारची उलटी गणती सुरु झाली, असे अनेकांनी म्हटले. मात्र, 2019 च्या निवडणुकीत जनतेने मोदी सरकारला 287 जागांऐवजी 303 जागांचे भक्कम संख्याबळ मिळवून दिले. फक्त सत्तापालटासाठी नव्हे तर खऱ्या अर्थाने बदल घडवण्यासाठी जनतेने मोदी सरकारला पुन्हा निवडून दिले असल्याचे, तोमर म्हणाले.
तसेच शेतकरी आंदोलनाविषयी बोलताना तोमर यांनी सरकार शेतकऱ्यांशी सर्व मुद्यांवर बोलण्यास तयार असल्याचे सांगितले.