मुंबई : महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं. अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे जर आज निवडणुक आयोगाने मताधिक्यावर निर्णय दिला तर धनुष्यबाण ठाकरेंकडून सुटू शकतो. त्यामुळे ठाकरे गटाकडून दुसऱ्या निवडणुक चिन्हांचा विचार केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता निवडणुक आयोगाकडे दोन्ही पक्षातील नेत्यांनी संख्याबाबत दावा ठोकला आहे.
“सत्यजित तांबे यांची बंडखोरी नाना पटोलेंमुळेच, खरगेंना पत्र, काॅंग्रेसमध्ये खदखद “
निवडणुक आयोगाकडे केलेल्या दाव्यानुसार शिंदे गटाकडे एकुण 40 आमदार, 13 खासदार, 144 पदाधिकारी, आणि 1,66,764 प्राथमिक सदस्य नोंदणी आहेत. तर संपुर्ण देशातील 11 राज्य प्रभारी असून ही सर्व कागदपत्रे निवडणुक आयोगाकडे सादर कऱण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडे विधानसभेचे 14 आमदार, विधान परिषदेचे 12 आमदार, लोकसभेचे 6 तर राज्यसभेचे 3 खासदार, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य एकूण 160, 2, 65, 542 पदाधिकारी संख्या, इतर राज्य प्रभारी 18 असून प्राथमिक सदस्य ही 18लाखांपेक्षा अधिक असून ही सर्व कागदपत्र निवडणुक आयोगाला देण्यात आली आहे.
“निवडणुक आयोग आणि तुमचं काही साठगाठ झालंय का?” सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला सवाल
दरम्यान, आज निवडणुक आयोग धनुष्यबाण या चिन्हांबाबत सुनावणी सुरू झाली आहे. यातच शिंदे गटातील नेत्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्याची शक्यता आहे.
Read also
- देशातील आर्थिक असमानता रोखण्यास मोदी सरकार अपयशी, १ टक्के अब्जाधीशांच्या ताब्यात देशातील ४० टक्के संपत्ती
- “आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता, मात्र…;” अजित पवारांची काॅंग्रेसवर नाराजी
- शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, या तारखेला होणार विस्तार?
- “धनुष्यबाण चिन्हाबाबत ठाकरे गटाचा बी प्लॅन तयार” आज महत्वाची सुनावणी
- “संजय राऊतांचं मनस्वस्थ ठिक नाही” चित्रा वाघ यांची राऊतांवर टिका