मुंबई : राज्यातील करोनाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, करोना बाधित रुग्णांच्या संख्येत देखील दररोज मोठी वाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत, राज्यातील १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या जनतेला महामारीवरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला. मात्र यावेळी राज्यात लगेच १ मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, अशी माहिती देखील यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
तसेच यावेळी त्यांनी, १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: लसींचे १२ कोटी डोस लागतील. मात्र त्यांनी लसींचा अपुरा पुरवठा होत असल्यामुळे, लगेच १ मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, अशी माहिती देखील सविस्तर स्पष्टीकरण देत संध्याकाळी दिली.
यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका करताना, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, “केवळ केंद्राकडे मागण्या करायच्या आणि परवानगी दिल्यावर आता कार्यवाहीला वेळ लागेल असे निमित्त देऊन जनतेला ताटकळत ठेवायचे. मग पुन्हा नवीन कोणत्या तरी मागणीसाठी रडत बसायचे हेच या सरकारचे धोरण आहे.” असा जोरदार हल्लाबोल केला आहे.
केवळ केंद्राकडे मागण्या करायच्या आणि परवानगी दिल्यावर आता कार्यवाहीला वेळ लागेल असे निमित्त देऊन जनतेला ताटकळत ठेवायचे. मग पुन्हा नवीन कोणत्या तरी मागणीसाठी रडत बसायचे हेच या सरकारचे धोरण आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 29, 2021
यावेळी, “१८ वयोवर्षापुढील सर्वांना लस मिळावी व राज्य सरकारला लस खरेदीची परवानगी मिळावी या दोन्ही मागण्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या दोन्ही मागण्यांना परवानगी दिल्यावर मात्र, राज्य सरकारचा बोलघेवडेपणा उघडा पडला आहे.” असंही केशव उपाध्ये यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
18 वयोवर्षापुढील सर्वांना लस मिळावी व राज्य सरकारला लस खरेदीची परवानगी मिळावी या दोन्ही मागण्या मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्याकडून मा. पंतप्रधान @narendramodi यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या दोन्ही मागण्यांना परवानगी दिल्यावर मात्र, राज्य सरकारचा बोलघेवडेपणा उघडा पडला आहे..3
— Keshav Upadhye (@keshavupadhye) April 29, 2021
तसेच, “आरक्षणाचा गोंधळ, परीक्षांचा बट्याबोळ या नंतर आता राज्यातील युवाविरोधी ठाकरे सरकारने, देशातील इतर राज्यातील युवक १ मे पासून लस घेत असताना धोरणाअभावी राज्यातील तरूणाला लसीकरणापासून वंचित ठेवले आहे. तरुणांना मोफत लस देणार अशी माध्यमामध्ये हवा करणारे सरकार पुन्हा एकदा तोंडघशी..” अशी टीका देखील केली आहे.