“यंदा महाराष्ट्रात ऊसाचे पीक वाढले असून शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत ही भेट घेतली असून गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली”, अशी माहिती फडणवीस यांनी भेटीनंतर पत्रकार परिषद घेत दिली.
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची शुक्रवारी भेट घेतली. महाराष्ट्रातील सध्याची कोरोना परिस्थिती आणि इतर विषयांवर दोन्ही नेत्यांची दीड तास चर्चा झाली, त्यांनतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचा खुलासा केला
“कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली. कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल”, असेही ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींची वेळ मिळाली तर त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येऊ शकतं याची माहिती देईन, अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील कोरोनास्थितीवर लक्ष ठेवून आहे. कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल. तसेच कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.