इंदापूर: इंदापुर तालुक्यातील ५७ गावांच्या बारमाही पाण्याच्या प्रश्नाबाबत गेली ३० ते ३५ वर्षे येथील शेतकरी मागणी करीत आहे उजनी धरणामध्ये सर्वात जास्त जमिनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या गेल्या आहेत परंतु त्यांना पाणी मिळत. इंदापूरच्या पाण्याबाबत नेहमीच राजकारण केले जाते हा निर्णय दुर्दैवी आहे ५७ गावाच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी अजून प्रतीक्षा पाहावी लागणार आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे राज्य शासनाचा हा निर्णय आम्हा इंदापूर करण्यासाठी अतिशय दुर्दैवी निर्णय आहे.त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाचा पुर्विचार करावा व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा.
यासाठी इंदापुरातील दुष्काळी गावांची पाहणी व सर्वेक्षण करावे लाखेवाडी, रेडा, रेडणी, काटी,वडापुरी,बोराटवाडी, वरकुटे, पिठेवाडी, भोडणी, निमगाव केतकी, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी, घोरपडवाडी, गोतोंडी, खोरोची, चाकाटी, हगारवाडी, आणि शेळगाव या गावांस इंदापुर तालुक्यातील ५७ गावच्या बारमाही पाण्याच्या प्रश्नाबाबत आज तब्बल ३० ते ३५ वर्षे येथील शेतकरी मागणी करीत आहे उजनी धरणामध्ये सर्वात जास्त जमिनी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याच्या गेल्या आहेत परंतु त्यांना पाणी मिळत नाही हे दुर्दैव आहे तसेच पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत असताना राज्य सरकारच्या “युटर्न” निर्णयाने आज परत या ५७ गावाच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी अजून प्रतीक्षा पाहावी लागणार आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाला आहे. राज्य शासनाचा हा निर्णय आम्हा इंदापुरकरांसाठी अतिशय दुर्दैवी निर्णय आहे, त्याचा सरकारने पुनर्विचार करावा अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या निरीक्षक डॉ अर्चना पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे नाराजी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
राज्य सरकारने या निर्णयाचा सरकारने पुर्विचार करावा व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासाठी इंदापुरातील दुष्काळी गावांची पाहणी व सर्वेक्षण करावे. लाखेवाडी, रेडा, रेडणी, काटी, वडापुरी, बोराटवाडी, वरकुटे, पिठेवाडी, भोडणी, निमगाव केतकी, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, सराफवाडी, घोरपडवाडी, गोतोंडी, खोरोची, चाकाटी, शिरसटवाडी, हगारवाडी, शेळगाव, या गावांसह त्याच बरोबर शेटफळ हवेली तलावावरील ९ गावे आणि शेटफळगढे ते बाभुळगाव पर्यंतची २५-२७ गावे याबरोबर अन्य दक्षिण पट्ट्यातील गावांची दुष्काळी म्हणून ओळख कायम आहे. इंदापुर तालुक्यातील या गावांना आजही पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
इंदापुरातील या गावांना सणसर कटव्दारे ३.९ टीएमसी पाणी दरवर्षी मिळेल असा निर्णय महाराष्ट्र शासनाने केला होता. परंतु, पाणीच मिळत नसल्याने या गावांच्या हक्काचे पाणी कोठे जाते? याचे कोडे आजपर्यंत या गावातील ग्रामस्थांना उलगडलेले नाही. याच पाणी प्रश्नावर शेतकऱ्यांना आत्महत्या देखील कराव्या लागल्या आहेत.
आम्हाला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाण्याचा एक थेंबही इंदापूर येथील शेतकरी मागत नाही आमचे हक्काचे पाणी पुणे महानगरपालिका व परिसर पिण्यासाठी वापरत असल्याने त्यामधून तयार होणारे सांडपाणी उजनी जलाशयात १७ ते १८ टीएमसी जमा होत असल्याने त्यापैकी ५ टीएमसी पाणी आम्हास मिळावे ही आमच्या शेतकऱ्याची मापक अपेक्षा आहे यासाठी आम्हाला कठोर पावले उचलावी लागली तरी मागे हटनार नाही. शेतकऱ्यांचा हा ‘एक लढा शाश्वत पाण्यासाठी’ असून हक्काचे पाणी मिळेपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. तरी आपण लवकरात लवकर तो आदेश मागे घ्यावा ही तमाम इंदापूर करांची मागणी आहे.