मुंबई: भारतात कोरोना महामारीची दुसरी महाभयंकर लाट सुरु झालेली आहे. लाखांच्या वर दिवसाला रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्र,पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,गोवा, उत्तराखंड, दिल्ली या राज्यांत मोठ्या प्रमाणावर कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. अश्यातच देश मोठ्या प्रमाणावर संकटात आहे. आता जागतिक स्तरावरून कोरोना परिस्थिती हाताळण्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अनेक प्रसार माध्यमांनी मोदींवर टीका केली आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात भारतातील सत्ताधाऱ्यांना, भारत सरकारला आलेल्या अपयशावर लक्ष वेधत जागतिक स्तरावर ताशेरे ओढण्याच आले आहेत.
देशाची कोणत्याही प्रकारची बदनामी सहन केली जाणार नाही. या परिस्थितीमध्ये राजकारण विसरुन आम्ही सर्वजण पंतप्रधान मोदी यांच्यासोबत आहोत असं लक्षवेधी वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मंगळवारी माध्यमांशी संवाद साधत असताना पंतप्रधान आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये आता समन्वय असून, ते येत्या काळात योग्य तोच निर्णय घेतील, आमचा पंतप्रधानांवर पूर्ण विश्वास आहे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली . देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता मद्रास उच्च न्यायालयानं अतिशय गंभीर टीप्पणी केली. ज्यामुळं देशातील विविध राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला निशाणा केलं गेलं. या टीप्पणीचा पंतप्रधान गांभीर्यानं विचारही करतील असंही ते म्हणाले.
मद्रास उच्च न्यायालयाप्रमाणेत कोरोनाच्या प्रसारासाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचं आम्हीही सांगत होतो असं म्हणत त्यांनी न्यायालयाच्या टीपण्णीला दुजोरा दिला. नागरिकांचा जीव महत्त्वाचा आहे की निवडणुका, असा प्रश्नही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. निवडणुकांमुळेच कोरोनाचा प्रसार झाला ही बाब १००% सत्य आहे. कुंभमेळ्यावर आक्षेप घेतला केला, त्याचप्रमाणं या राजकीय कुंभमेळ्यावरही आक्षेप असल्याचं म्हणत त्यांनी या परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. देश संकटात असताना कुंभ मेळा असो अथवा निवडणुकांचे रणांगण असो दोन्ही गोष्टी या चुकीच्या आहेत आणि नक्कीच या गोष्टींमुळे कोरोना महामारीचा प्रसार जास्त झालेला आहे.