मुंबई : हाथरसमध्ये पीडितेच्या कुटूंबावर गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे, त्यांचे फोन हिसकावून घेतले गेले आहेत, घरात कुलूप लावले गेले आहे आणि संपूर्ण गाव पोलिसांनी तळ ठोकून ठेवले आहे. मीडियातील लोकांचे फोन टॅप करून त्यांना मारहाण केली जात आहे. दिशाभूल करणारा ऑडिओ लीक केला जात आहे. किती हा निर्लज्जपना, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर केली आहे.
हाथरस में पीड़िता के परिवार से गुनहगारो जैसा बर्ताव हो रहा है, उनके फ़ोन छीन लिए गए है, घर मे बंद कर दिया है और पूरे गाँव को पुलिस ने छावनी बना दिया है।सांसदो को मारा पीटा जा रहा है, मीडियाकर्मियों के फ़ोन टैप करके गुमराह करने वाले ऑडियो लीक किये जा रहे है।
और ये बेशर्मी देखिये pic.twitter.com/q4GrZablnm
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 3, 2020
उत्तर प्रदेशात हाथरस येथे घडलेल्या घटनेसंबंधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला बोचरा सवाल केला आहे. ‘आज संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात महिला सबलीकरणावर देशाच्या महिला बालविकास मंत्र्यांनी लांबलचक भाषण दिलं, मात्र देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही. देशात बळावत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक कायदे आणून कठोर भूमिका घेणं गरजेचं असताना केंद्र सरकार मात्र शांत बसलं आहे. याहून देशाचं मोठं दुर्दैव काय असू शकतं?’, अशा शब्दांत रोहित यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
रोहित पवार यांनी या विषयी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त करताना आकडेवारीही दिली आहे. केवळ केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारनेही दिशा कायद्यासारख्या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पवार यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात हाथरस येथे घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण समाजालाही आत्मचिंतनाची गरज आहे. दिल्ली, कोपर्डी, कथुआ, हैदराबादपासून तर हाथरसपर्यंत आपल्या बहिणींवर अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. अशी अमानुष घटना घडली की संपूर्ण समाज पेटून उठतो, सोशल मीडिया, राजकीय पक्ष, वृत्त वाहिन्या, सामाजिक संस्थापासून सर्वच ठिकाणी निषेध नोंदवला जातो. दोषींना शिक्षेची मागणी होते, ही चांगली गोष्ट आहे.
सरकारच्या भूमिकेवरही रोहित पवार यांनी परखड मत मांडले. ‘महिलांवर जर अत्याचार होत असतील तर महिलांना सन्मानाची वागणूक देण्याची शिकवण देणाऱ्या आपल्या थोर महात्म्यांचा हा एकप्रकारे अपमानच आहे. म्हणून माझी महाराष्ट्र सरकारलाही विंनती आहे की, आपल्या राज्यात ‘ दिशा ‘सारखा कठोर कायदा लवकरात लवकर लागू करावा.’ केंद्र सरकारवर मात्र त्यांनी टीका केली आहे.
‘केंद्र सरकार नेहमीप्रमाणे संवेदनशील मुद्द्यांवर असंवेदनशील असल्याचं दिसतं. हाथरस, खरगोन, बलरामपूर या ठिकाणी सलगपणे दुर्दैवी अत्याचाराच्या घटना घडत असताना देशाचं सर्वोच्च नेतृत्व मात्र मौन धारण करून आहे. आज संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात महिला सबलीकरणावर देशाच्या महिला बालविकास मंत्र्यांनी लांबलचक भाषण दिलं, मात्र देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर बोलण्याची त्यांची हिम्मत होत नाही. देशात बळावत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक कायदे आणून कठोर भूमिका घेणं गरजेचं असताना केंद्र सरकार मात्र शांत बसलेलं आहे, याहून देशाचं मोठं दुर्दैव काय असू शकतं?’, असा संताप रोहित यांनी व्यक्त केला.
Read Also :
जगभरात जाऊन मोठमोठी भाषणं ठोकणारे हाथरस प्रकरणावर शांत का?: आमदार रोहित पवार https://t.co/Y4jJifc7FD @RRPSpeaks @RohitPawarSpeak @RohitPawarOffic
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 3, 2020