मुंबई : गेल्या काही महिन्यात करोना आणि वादळी परिस्थितीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना झोडपून काढले. संपूर्ण राज्यात वादळामुळे भरपूर नुकसान झाले. या नुकसानाची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौरा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल झाले तेव्हा त्यांनी नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलेल्या धनादेशांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा सोलापूरला पहाणी दौऱ्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या हस्ते तीन हजार रूपयांच्या चेकचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री पदी असलेली व्यक्ती जेव्हा अशा ठिकाणी जाते तेव्हा त्यांच्या हस्ते किती मदत द्यावी याचा काहीतरी राजशिष्टाचार ठरवण्यात आला पाहिजे.
कारण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अवघ्या तीन-तीन हजारांचे चेक नुकसान भरपाई म्हणून देणं योग्य नाही. अजितदादा, मुख्यमंत्र्यांच्या हाताने केवळ तीन हजारांचे चेक वाटप केलं जाणं बरोबर आहे का? अशा प्रकारची मदत देणं म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ याच म्हणीप्रमाणे आहे”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.
मुख्यमंत्रीपदाच्या व्यक्तीच्या हस्ते केवळ तीन हजारांच्या चेकचे वाटप करणं हा पदाचा अपमान आहे. मला उद्धव ठाकरेंना विचारावंसं वाटतं की या अपमानाने तुम्ही का व्यतित झाला नाहीत? हा केवळ मुख्यमंत्र्यांचाच नव्हे तर शेतकऱ्यांचाही अपमान आहे.
ज्या शेतकऱ्यांनी वादळात आपलं घर गमावलं, अशा शेतकऱ्याला कुठल्यातरी योजनेतील अवघे तीन हजार रूपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चेकमार्फत दिले जातात ही शरमेची बाब आहे. किमान आपल्या मुख्यमंत्र्यांची इभ्रत टिकवण्यासाठी तरी अशा लोकांवर कारवाई करा, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
Read Also :
जगभरात जीमेल, गुगल आणि युट्यूब का झालं होत झालं डाऊन?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बंगला महापालिकेकडून डिफॉल्टर घोषित
‘रवी राणांचा पोशाख पाहून अध्यक्ष भडकले आणि त्यांना बाहेर काढले’