मुंबई : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या पॅकेजची घोषणा आज करण्यात आली आहे. जवळपास १० हजार कोटी रुपयांची मदत आता महाविकासआघाडी सरकार शेतकऱ्यांना करणार आहे. यामध्ये फळबाग आणि इतर पिकांचे निकष ठरवून दिलेले आहेत. शेतीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार तर फळबागेसाठी २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी जाहीर करण्यात आले आहे.
पण आता यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे, किमान शेतकर्यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे.
नियमित अर्थसंकल्पातील आकड्यांनाच पॅकेज भासवून मलमपट्टी केल्याचा आव सरकार आणू पाहतेय पण, केवळ देखावा निर्माण करून शेतकर्यांना अजीबात मदत मिळणार नाही. बहाणेबाजी करून महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची घोर निराशा केली, फसवणूक केली. असा आरोप त्यांनी केला आहे.
किमान शेतकर्यांच्या बाबतीत तरी आणि झालेल्या नुकसानीची तीव्रता पाहता अशा काल्पनिक आकड्यांची धूळफेक मुख्यमंत्री करतील, असे वाटले नव्हते. हा शेतकर्यांसोबत झालेला मोठा विश्वासघात आहे. निसर्गाने तर अन्याय केलाच, आता सरकारही सूड घेत आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 23, 2020
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी मदतीसाठी केंद्राकडे याचना केली होती, केंद्र सरकारने महाराष्ट्राचा जीएसटीचा परतावा द्यावा अशी मागणीही करण्यात आली होती. तथापि सरकारमधील अनेक नेत्यांनी नुकसानग्रस्त विभागांची पाहणी केली होती. पण आता सरकाने मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौऱ्यात आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हटलं होत.
पण आता या मुदतीनंतर विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका होताना दिसत आहे, विरोधी पक्ष भाजपने सरकारने केलेली हि मदत अतिशय तुटपुंजी आहे अशी टीका केली आहे,यावर आता सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
आज पूर व अतिवृष्टीग्रस्त ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आज वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री ॲड अनिल परब उपस्थित होते.
Read Also :
सुप्रिया सुळे यांच्या हस्ते रोहिणी खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश…उत्तर महाराष्ट्रात महिला राष्ट्रवादीला नवे बळ https://t.co/ZqLiHefkdq@EknathGKhadse #RohiniKhadse #EknathKhadse @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 23, 2020