नागपूर : विदर्भाच्या दृष्टीकोनातून ठाकरे सरकारने जे दिलं नाही, ते आताच्या शिंदे-फडणवीस सरकारने दिलं आहे. त्यावरून शिंदेंनी विरोधकांना झुकतं माफ देखील दिलं. हे अपेक्षित नव्हतं की, हे सरकार इतके चांगले निर्णय घेईल. त्यामुळे शिंदे अन् फडणवीस साहेबांची जोडी ही राम लक्ष्मणाची जोडी आहे. असं विधान उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी केलं आहे.
“एकनाथ शिंदे गट महाराष्ट्रात गुंडराज आणू पाहत आहे का ?” राष्ट्रवादीचा सवाल
एखाद अपवाद वगळता इतका चांगलं वातावरण असताना विरोधकांकडून अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणत आहेत. परंतु विधानसभा अध्यक्षांनी सत्ताधारी आणि विरोधकांना देखील बोलण्याची संधी दिली. तसेच सभागृह सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत सर्वच मंत्री सभागृहात असतात. परंतु त्यांना का अविश्वास ठराव सभागृहात आणला. त्याचं कारण अजूनही उलगडत नाही. अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली.
“रूपाली पाटलांनी पुराव्यासहित ती फाईल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे सोपविली, कारवाईची प्रतिक्षा “
सध्या महाविकास आघाडी मध्ये समन्वय राहिलेलं दिसून येत नाही. विरोधी पक्षनेते हे संपुर्ण विरोधी पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे असा मोठा निर्णय घेण्याच्या अगोदर किमान आघाडीतील इतर नेत्यांनी प्रमुख नेत्याला तरी विचारलं पाहिजे होतं. त्यामुळे विरोधक सध्या भांबावलेल्या स्थितीत आहेत. काय करायचं त्यांना सुचत नाही. त्याचं कारण म्हणजे शिंदे-फडणवीस सरकारने लोकांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांची अशी स्थिती झाली आहे. असंही त्यांनी म्हटलं.
Read also
- नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन, देशभरातून भावपुर्ण श्रंद्धाजली
- भारतातील पहिल्या संविधान भवनच्या कामाला गती द्या : आमदार महेश लांडगे
- “..तर तुम्ही मला लग्न करण्यापासून थांबवलं असतं”, फडणवीसांनी सांगितला तो लग्नाचा किस्सा
- “उद्या एकनाथ शिंदे सभागृहात खाकी पॅट घालून आले, तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू”; संजय राऊत
- “अब्दुल सत्तारांच्या 50 पेक्षा घोटाळ्याची प्रकरणं बाहेर येणार”