मुंबई : वीज बिल माफीबाबत सरकार गंभीर आहे. वीज ग्राहकांची सेवा हाच आमचा धर्म आहे. वीज ग्राहक हा आमचा देव आहे आम्ही त्या ग्राहकाचे नुकसान आम्ही करणार नाही असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पायाभूत सुविधेला बळकटी देण्याचे काम सुरु आहे.
वीज थकबाकीची देणी गेल्या सरकारने आमच्या माथी मारली आहेत. जीएसटीचे पैसे अद्याप केंद्राने दिलेले नाहीत. १०० युनिट वीज बिल माफीबाबत गट तयार करण्यात आला आहे अशीही माहिती नितीन राऊत यांनी दिली. दरम्यान वाढीव वीज बिलांच्या मुद्यावरुन भाजपाने मंत्रालयात शिरुन आंदोलन करु असा इशारा दिला आहे.
राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर मी अजूनही ठाम आहे. पण मागच्या सरकारने जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं आधी निरसन करून नंतरच 100 युनिट वीज माफी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यावर काम सुरू आहे, असं राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज स्पष्ट केलं.
100 युनिट वीज माफी करावी असं मला वाटतं, असं मी म्हणालो होतो. त्यासाठी अभ्यासगटाची समिती स्थापन करण्यात आली. मधल्या काळात कोरोना आल्याने या अभ्यासगटाच्या बैठका झाल्या नाहीत. त्यामुळे समितीचा अहवाल आला नाही. आताची महावितरणची आर्थिक स्थिती पाहता 59 हजार कोटींची तफावत आली आहे. मागच्या सरकारनं जे पाप करून ठेवलं आहे. त्याचं निरसन करूनच 100 युनिट वीज माफीचा निर्णय घेण्यात येणार असून 100 युनिट वीज माफी देण्यावर मी ठाम आहे. ही वीज मी माफ केल्याचं तुम्हीही पाहाल, असं राऊत म्हणाले.
Read Also :
‘फडणवीसांना उठबशा काढू द्या, त्यांना आम्हीच चितपट करणार’ मंत्री जयंत पाटलांची वल्गना
फडणवीस सरकारच्या काळातील वीज बिल थकबाकीची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश
कोरोनामुळे दिल्ली-मुंबई विमानसेवा बंद होणार?
भगव्याचा रंग तुम्हीच फिका केला ; आशिष शेलारांचा सेनेवर हल्लबोल
31 डिसेंबरपर्यंत बंद राहणार मुंबईतील शाळा; आयुक्तांचा निर्णय
“आता लवकरच महाराष्ट्रातही सत्तांतर होऊन राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल”