पुणे : पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आज (15 नोव्हेंबर) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जमलेल्या अलोट गर्दीने लाडक्या शिवशाहिराला साश्रुनयनांनी निरोप दिला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी पहाटे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.
शिवचरित्राचा महान उपासक गमावला, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली – चंद्रकांत पाटील
14 नोव्हेंबरला सायंकाळी बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आली होती. उपचार सुरू होते, पण सोमवार शिवशाहिरांच्या निधनाचं वृत्त घेऊनच उजाडला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. त्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. सकाळी 8:30 वाजता पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव नेण्यात आलं. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत पार्थिव आणण्यात आलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या. त्यानुसार मानवंदना देऊन बाबासाहेबांना अलोट गर्दीच्या साक्षीने अखेरचा निरोप देण्यात आला.
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्यात झाला होता. त्यामुळे पुणे हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी होती. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘नारायण राव पेशवा’,‘केसरी’ यासारखी अनेक पुस्तकं लिहली. पण ‘राजा शिवछत्रपती’ या कांदबरीने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. याच कांदबरीमुळे बाबासाहेब हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले.
Read Also :
- यशोमती ठाकूर राजकीय पोळी भाजण्याचे काम करतायं, मुख्यमंत्र्यानी राजीनामा घ्यावा – रवी राणा
- “राज्यात दंगली भडकवण्यात आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्यात आघाडीचाच हात”
- वर्ध्यात भाजपला बसला मोठा धक्का; नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्षाने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना अटक
- एकत्र येण्याची इच्छा उरली नाही; भाजप- सेना युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान