मुंबई: राज्यातील ५ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया स्थगित करण्यात करण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नाही. तसंच आगामी काळात तिसऱ्या लाटेचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू आहेत, त्यामुळे या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत, त्यानंर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्टिट करत ओबीसी सर्व नेत्याचे अभिनंदन केले.
जिल्हा परिषद निवडणुका रद्द झाल्या कारण काहीही असो आता जो मिळाला आहे तो वेळ obc आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरावा. .सर्व obc आरक्षणासाठी लढणार्याचे अभिनंदन अभिनंदन!!!!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 9, 2021
पंकजा मुंडे म्हणाल्या की, ओबीसी राजकीय आरक्षण पूर्वरत करणे ही जबाबदारी सर्वच ओबीसी नेत्यांची आहे. आता ओबीसी सर्व नेत्यांनी कुठली वेळ वाया न घालवता सर्वांनी मिळून यावर काम करणे गरजेचे आहे. ओबीसी नेत्यांना जो वेळ मिळाला आहे तो वेळा ओबीसा आरक्षण मिळवून उपयुक्त ठरावा. तसेच त्यांनी आपल्या ट्टिटमध्ये सर्व ओबीसी नेत्याचे अभिनंद ही केले आहे.
राज्य सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द
ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना धक्का देणारा आहे. न्यायालयात बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार कमी पडले, असे अनेक जण म्हणतात, पण माझे मत असे आहे की या सरकारला ओबीसींची बाजू मांडायचीच नाही, म्हणून असा निर्णय आला. मी ग्रामविकास मंत्री असताना हा विषय हाताळला आहे. आम्ही मागच्या सरकारमध्ये भूमिका मांडल्या, अभ्यासगट नेमला. त्यात आम्ही अध्यादेश काढू असे म्हटले होते. निवडणुका झाल्या, आमचे सरकार गेले. नवीन सरकार आले. १५ महिन्यांत कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे अध्यादेश संपुष्टात आला. या निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय होणार आहे. राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण गेले, आता ओबीसी आरक्षण रद्द झाले, पण अजूनही राज्य सरकारच्या हातात खूप काही आहे. कॅबिनेट शक्तीशाली असते. तीनही पक्षातील नेत्यांनी तत्काळ निर्णय घेऊन अभ्यासगट स्थापन करावा, मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून अभ्यास करुन लवकर निर्णय घेऊन ओबीसींना न्याय मिळवून द्यावा.