मुंबई : विधिमंडळाचे दुसऱ्या दिवसाचे अधिवेशन आज संपुष्टात आले.अधिवेशनाच्या सुरुवातील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला धारेवर धरत अनेक प्रश्न पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून विचारले होते मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही उत्तरे देण्यात आली नाही त्यामुळे अधिवेशन संपल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांसमोर सरकारने उत्तरे न दिलेल्या प्रश्नांचा पाढाच वाचला.
सरकारने कोणत्याही प्रश्नांची उत्तरे न देऊन सर्वसामान्य माणसांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी केला.
‘या’ प्रश्नांची उत्तरे सरकारने दिली नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेबाबतच्या प्रश्नांची उत्तरे दिली गेली नाहीत.
वाढत्या बिलाबाबत काहीच उत्तर दिले नाही.
युवा पत्रकाराच्या मृत्यूबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.
कोरोनाबाबतची कोणतीही उत्तरे दिली नाहीत.
कोविड बाबतचे अजून ५०० मृत्यू सरकारने अद्यापही घोषित केलेले नाही
मुंबई,पुणे व्यक्तिरिक्त उर्वरित महाराष्ट्र वाऱ्यावर सोडलाय का ? यावर उत्तर नाही
शेतकऱ्यांच्या बोगस बियाणांचा विषय /अतिवृष्टीचे नुकसान त्याच काय ?
कोरोनामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबाबत कोणतेही उत्तर नाही.
Read Also
. . मग हीच भूमिका ‘सामना’ बाबत लावा, देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीकाhttps://t.co/Y1fMaSBD8G@Dev_Fadnavis
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 8, 2020