यवतमाळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी करायची असेल तर करू द्या. त्याने काही फरक पडत नाही. कारण त्याला ठाण्याच्या गल्लीच्या बाहेर त्यांना कोणी विचारत नाही. असा शाब्दिक हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलं आहे. यवतमाळमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी टीव्ही9ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
“आम्ही स्वार्थासाठी मशाल पेटवलेली नाही, आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून तुम्ही नाव घेता सगळीकडे. तुम्हीच आठवा. मुंबईतील कोणत्याही वार्डात त्यांना कोणी कधी कोणत्या कार्यक्रमाला बोलावलं होतं का? प्रभावी नेते म्हणून मुंबईत कुठे त्यांना भाषणाला बोलावलं होतं का? असा सवाल करत सध्या सरकारकडून मुद्दे भरकटवण्याचं काम सुरू असल्याचंही सावंत यांनी म्हटले.
“आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या, हे महाशय काय आणतात बघुया”; भाजपचा खोचक टोला
रोज वर्तमानपत्रातून जाहिरात दिली जात होती. मुंबईत सुशोभिकरण करणार असल्याच्या वल्गना केल्या जात आहे. मुळात सुशोभिकरणाची संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती. ही संकल्पना कृतीत येण्याच्या वेळी पाठीत सुरा खुपसला गेला. आता त्याचं भांडवलं केलं जात आहे. कोणी आमदार, खासदार गेले म्हणजे शिवसेना खच्ची झाली हा भ्रम आहे. त्यांचं उत्त आज मोर्चातून मिळेल. शिवसेना ही शिवसैनिकांची आहे. शिवसैनिक जसा आहे तसा आहे. पालापाचोला उडतो. हेमंत ऋतु आल्यावर, नवी पालवी फुटते. नवीन मुलं आमच्याकडे येत आहेत. असा दावाही त्यांनी यावेळी केला.
Read also
- “चाकणकर ताई..! तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारी सोडवा..;” चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर
- “उद्या ठाकरे-शिंदेंचा फैसला होणार, जर असं झालं तर प्रकरण आणखी लांबणीवर”?
- “मला सध्या राजकारणात संधी न देणाऱ्यालाच विचारा”; पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे?
- “शरद पवार उद्या रूग्णालयात दाखल, बाहेर न पडण्याचा डॉक्टरांचा सल्ला”
- “…तर तुम्ही राज्यसभेचा राजीनामा देणार का?” मुनगंटीवारांचा राऊतांना ओपन चॅलेंज