मुंबई : मुंबईत माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी १९९३ प्रमाणे जसा बाॅम्बस्फोट घडवून आणला होता. तसा बाॅम्सब्लास्ट २ महिन्यानंतर होणार असल्याची धमकी देणाऱ्याला एटीएस ने बेड्या ठोकल्या आहेत. ७ जानेवारी रोजी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिली होती. त्यावरून आता भाजप नेते आणि मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
चित्रा वाघ आता गप्प का? त्यांचे तर कपडे सुद्धा..; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
आशिष शेलार यांनी ट्विट करून माहिती दिली की, १९९३ मध्ये जसे बाॅम्स्फोट झाले, त्याप्रमाणे दोन महिन्यानंतर मुंबईमध्ये बाॅम्बस्फोट होणार आहे. त्यानंतर मुंबईमध्ये जातीय दंगली होणार, असे एका संशयिताने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कळवले आहे. संशयित गुन्हेगार हा पोलिसांकडून नबी याहया खान ऊर्फ के.जी. एन. लाला याला अटक करण्यात आली असल्याचंही आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
“त्यामुळे काहींचं का आकाश पाताळ एक झालं”; अजित पवारांनी त्या वक्तव्यामुळे मागितली माफी
१९९३ च्या बाॅम्बस्फोटातील काही आरोपी लालाच्या परिचयाचे, अशी माहिती समोर आली आहे. आमचा मुंबईच्या तथाकथित रक्षणकरत्यांना सवाल आहे की, नवाब मलिक, दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण, याकुबची कबर सजवली आणि आता याचा तरी निषेध करणार का ? असा सवाल शेलारांनी महाविकास आघाडीला केला आहे.
“नारायण राणे यांचं केंद्रातील केंद्रीय मंत्रीपद लवकरच जाणार”, मोठ्या नेत्याचं भाकित
तसेच पुढे असं म्हटलं आहे की, या अशा घातक गुन्हेगार, समाजकंटकांना बळ कसे मिळते? राजकीय स्वार्थासाठी लागुलचालनाच्या राजकारणाचे घातक पट कोण रचतेय? आम्ही जागर मुंबई मधून हेच मुंबईकरांसमोर उघड करतोय. आम्ही स्वार्थासाठी मशाल पेटवलेली नाही. आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय. असंही ते म्हणाले.
१९९३ मध्ये जसे बॉम्बस्फोट झाले, त्याप्रमाणे दोन महिन्यांनंतर मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार..त्यानंतर मुंबईमध्ये जातीय
दंगली होणार, असे एका संशयिताने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कळवले.
संशयित सराईत गुन्हेगार…
1/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 9, 2023
Read also
- “आजोबांनी क्रिकेटमध्ये चीअरलीडर्स आणल्या, हे महाशय काय आणतात बघुया”; भाजपचा खोचक टोला
- लहू बालवडकर सोशल वेलफेअरच्या चैतन्यस्पर्श सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, महिला पुरुष भजन स्पर्धेचेही होतंय कौतुक
- “राणेंच्या बोलण्यात तथ्य, संजय राऊत असं अनेकदा बोललाय”; शिरसाठांनीही आगीत तेल ओतलं
- “राज्यात जो बोलेल त्याचा आवाज दाबला जात, त्यामुळे आम्ही आता ठरवलंय”
- “आयोग म्हणजे तुम्ही एकट्या नाहीत, हे लक्षात ठेवा”; चित्रा वाघ रूपाली चाकणकरांवर भडकल्या