पुणे : राज्यात मागील काही दिवसापासून महापुरूषांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे. यातच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले ऐवजी सावित्रीबाई होळकर असा उल्लेख केला आहे. त्यानंतर त्यांनी लगचेच याबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे.
कधी कधी बोलण्याच्या ओघात माणसाकडून चुकभूल होते. पण प्रसारमाध्यमांमध्ये याचा एवढा मोठा गवगवा केला जातो. मी सावित्रीबाई फुले यांना चुकून सावित्रीबाई होळकर म्हणालो, यामध्ये मी असा काय मोठा गुन्हा केला होता. ज्यामुळे अनेकांचं आकाश पाताळ एक झालं. खरं तर, मी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. त्यामुळे माझ्याकडून अशी चुक व्हायला नको होती, परंतु बोलण्याच्या ओघात चुक झाली असंही अजित पवार म्हणाले.
“ते ऐकलं तर उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील”; नारायण राणेंचा राऊतांना इशारा
मी अहिल्याबाई होळकरांनाही तसंच बोललो आणि सावित्रीबाई फुलेंचा उल्लेख फुले म्हणण्याऐवजी होळकर असा केला. माझी चुक लक्षात आल्यानंतर मी लगेच दिलगीरीही व्यक्त केली. जिथे आपल्याकडून चुक होते, तिथे दिलगीरी व्यक्त करून पुढे जायचं असतं. असं आपल्याला वडिलधाऱ्यांनी शिकवलं आहे. यामुळे कुणाचं काही बिघडत नाही. असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
Read also
- “नारायण राणे यांचं केंद्रातील केंद्रीय मंत्रीपद लवकरच जाणार”, मोठ्या नेत्याचं भाकित
- अजित पवारांच्या दौऱ्यांत सतर्क रहा, पोलिसांना गृहविभागाच्या सूचना
- “ज्यांची भीती सत्ताधाऱ्यांना नसते त्यांना कुठेही लघूशंका करण्याची परवानगी मिळते”
- “येत्या ८ ते १० दिवसात ठाकरे गटातील…”; उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा आणणारी बातमी
- “शिंदे सरकार सध्या व्हेंटिलेटर, हे काढलं की सरकारचं राम नाम सत्य है…!”