पिंपरी । विशेष प्रतिनिधी पुणे-नाशिक महामार्गावरील बंद केलेला मोशी टोलनाका गुरुवारपासून (दि. ५) पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करण्यासाठी या टोलनाक्यावर ३१५ रुपये देऊन मासिक पास काढावा लागणार आहे. परिणामी, लोकभावनेचा उद्रेक झाला असून, प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या हलक्या वाहनांसह जड वाहनांना १५ रूपयांपासून १५५ रूपये मोजावे लागणार आहेत. टोलनाका पुन्हा सुरू झाल्याने वाहन चालकांना नाहक आर्थिक भुर्दंडासह वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि केंद्रात व राज्यातील सत्ताधारी भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही विरोध केला असून, सर्वपक्षीय विरोधामुळे स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मोठी अडचण झाली आहे.
आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात..! अपघातात गाडीचा चक्काचूर, मोठा अनर्थ टळला
शिरुर लोकसभा मतदार संघांतर्गत पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी येथील टोलनाका बंद होता. तो पुन्हा सुरू झाल्यामुळे मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे काय भूमिका घेणार? याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले होते. यावर कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून टोलनाका बंद करावा, अशी मागणीही केली. वास्तविक, डॉ. कोल्हे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत. केंद्रीय मंत्री अमित शहा आणि नितीन गडकरी यांच्यासोबत कोल्हे यांची जवळीक आहे. याबाबत राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटामुळे कोल्हे यांच्यावर भाजपा सलोख्याची टीकाही झाली होती. त्यानंतर ‘गरुडझेप’ चित्रपटाच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री अमित शहा यांची कोल्हे यांनी भेट घेतली होती. त्यामुळे कोल्हे भाजपात प्रवेश करतील, असाही तर्क लढवण्यात येवू लागला होता.
“याला म्हणतात, काखेत कळसा आणि गावाला वळसा”; म्हणून, राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल
भाजपाच्या ‘निर्णायक’ नेत्यांशी जवळीक असतानाही मोशी टोलनाक्याबाबत डॉ. कोल्हे यांनी केवळ पत्र पाठवण्यात धन्यता मानली. याउलट, विद्यमान खासदार या नात्याने डॉ. कोल्हे यांनी स्थानिक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर उतरुन टोल नाक्याला विरोध करवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णुचा अवतार म्हणतात, त्यामुळे आम्ही..;”भुजबळांचं भाजपला प्रत्युत्तर
टोलनाक्यामुळे वाहतूक कोंडी वाढणार…
टोलनाक्यांवरील रांगांमुळे मोशीतून अवघ्या सहा सात किलोमीटर असलेल्या चाकणला किंवा चार किलोमीटरवर असलेल्या भोसरी, नाशिक फाट्याला जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो. रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यामुळे अनेक वर्षे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टोल नाका बंद झाल्याने मध्यंतरी काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, आता पुन्हा टोल वसुली सुरू झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा टोल कायमचा बंद करावा. त्यासाठी स्थानिक सर्वपक्षीय ग्रामस्थांसह खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आक्रमक भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.
Read also
- “ते ऐकलं तर उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील”; नारायण राणेंचा राऊतांना इशारा
- मोठी बातमी…! शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली, या तारखेला विस्तार होणार ?
- शिंदे, ठाकरे अन् फडणवीस एकाच मंचावर येणार…! शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच मोठी राजकीय घडामोड
- “त्यावेळी मग ममता बॅनर्जी मुंबईत गोट्या खेळायला आल्या होत्या का?” भाजपाचं जोरदार प्रत्युत्तर
- “आम्ही पण तयार आहोत”, असं म्हणत नितेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा