मुंबई : मुंबईतील कोणताही उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाहीत. ते महाराष्ट्रातच राहतील, कारण महाराष्ट्राच्या बाहेर जाण्यास आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडी आहे. त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जी आल्या होत्या. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनीच त्यांचं स्वागत केलं होतं. मग त्यावेळी त्या गोट्या खेळायला आल्या होत्या का?असा सवाल भाजप नेते राम कदमांनी विरोधकांना विचारला आहे.
“त्या ऊर्फीला पण यावर नाचवा”..! त्या प्रकरणावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुंबईतील अनेक उद्योगपतींशी भेटीगाठी घेतल्या. तसेच योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन 5 लाख कोटींची गुंतवणुक घेऊन गेलेत. असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्यावर राम कदमांनी विरोधी पक्षाला प्रत्यु्त्तर दिलं आहे. ते मुंबईत समाज माध्यमांशी बोलत होते.
ममता बॅनर्जी ज्यावेळी मुंबईत आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी देखील उद्योगपतींशी भेट घेऊन त्यांनी पश्चिम बंगालमध्ये गुंतवणुक करा अशा सांगत होत्या. त्यामुळे मुंबई महाराष्ट्रातील कोणताही उद्योग महाराष्ट्रा बाहेर जाणार नाही. तसेच प्रत्येक मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की, वेगवेगळ्या राज्यात जाऊन गुंतवणुक वाढवणं. तसाच प्रयत्न एखादा मुख्यमंत्री करत असेल तर ते योग्य नाही. असंही राम कदम यांनी म्हटलं आहे.
“माझा स्वभाव वाईट, संजय राऊतला सोडणार नाही, त्याच्यावर केस टाकेन”, नारायण राणे भडकले
दरम्यान, मुंबईतील प्रसिद्ध ताज हाटेलमध्ये योगी आदित्यनाथ यांनी जगातील श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि हरीत ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन देखील अंबानीने यावेळी योगींना दिले. त्याचसोबत अदानी समुहाने पीपीपी मॉडेलवर आधारीत वैद्यकीय संस्था उभारण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही उत्तर प्रदेशसरकारकडून देण्यात आली आहे.
Read also
- “आम्ही पण तयार आहोत”, असं म्हणत नितेश राणेंचा राष्ट्रवादीला इशारा
- आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा अपघात..! अपघातात गाडीचा चक्काचूर, मोठा अनर्थ टळला
- “याला म्हणतात, काखेत कळसा आणि गावाला वळसा”; म्हणून, राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल
- “तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णुचा अवतार म्हणतात, त्यामुळे आम्ही..;”भुजबळांचं भाजपला प्रत्युत्तर
- “आता काश्मीरला जाण्याची गरज राहणार नाही, मुंबईत 521 एकर फिल्मसीटी उभारणार”; सुधीर मुनगंटीवार