मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौऱ्यावर मोठ मोठ्या उद्योगपतींशी भेटीगाठी घेतल्या. उत्तर प्रदेशात फेब्रुवारी महिन्यात ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात आले आहेे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी उद्योगपतींशी भेटी घेतल्या. मात्र या भेटी दरम्यान, त्यांनी जवळपास 5 लाख कोटी रूपयांची गुंतवणुक महाराष्ट्रातून घेऊन गेल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने दिली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध ताज हाटेलमध्ये योगी आदित्यनाथ यांनी जगातील श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि हरीत ऊर्जा क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीचे आश्वासन देखील अंबानीने यावेळी योगींना दिले. त्याचसोबत अदानी समुहाने पीपीपी मॉडेलवर आधारीत वैद्यकीय संस्था उभारण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही उत्तर प्रदेशसरकारकडून देण्यात आली आहे.
“त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे….;” बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर
मुंबई दौऱ्याच्या वेळी योगींनी रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी, यांच्यासह टाटा सन्स, अदानी समुह, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदूजा, लोढा आदी कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खोचक टिप्पणी केली आहे.
“तो बोलत राहिला तर त्याला पुर्ण नागडा करीन”; संजय राऊतांचा नारायण राणेंवर संताप
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि 5 लाख कोटी रूपयांची गुंतवणुक घेऊन गेले. पण महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा असतानाही गुंतवणुकदारांना भेटून त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुक करायला लावावी, असं आपल्या सरकारला वाटलं नाही. याला म्हणतात. काखेत कळसा आणि गावाला वळसा. असं म्हणून रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आले आणि ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन गेले… पण महाराष्ट्रात सगळ्या पायाभूत सुविधा असतानाही गुंतवणूकदारांना भेटून त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करायला लावावी, असं आपल्या सरकारला वाटलं नाही.
याला म्हणतात…
‘काखेत कळसा आणि गावाला वळसा!’— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 7, 2023
Read also
- “तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णुचा अवतार म्हणतात, त्यामुळे आम्ही..;”भुजबळांचं भाजपला प्रत्युत्तर
- “आता काश्मीरला जाण्याची गरज राहणार नाही, मुंबईत 521 एकर फिल्मसीटी उभारणार”; सुधीर मुनगंटीवार
- “त्या ऊर्फीला पण यावर नाचवा”..! त्या प्रकरणावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
- “चित्रा वाघ यांनी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा कारवाई होईल”; उर्फी अन् वाघ यांच्या वादात चाकणकर
- “माझा स्वभाव वाईट, संजय राऊतला सोडणार नाही, त्याच्यावर केस टाकेन”, नारायण राणे भडकले