मुंबई : मागील काही दिवसापासून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आला आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावरून देखील राज्यातील राजकीय नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्याला उर्फीमध्ये अडकडवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले”
अमृता फडणवीस यांचं आज नवीन आज मै मुड बणा लेया हे पंजाबी गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. याच गाण्याच्या प्रोमोशनसाठी त्या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी त्यांना याप्रकरणावर विचारले असता त्यांनी ऊर्फी जावेद आणि चित्रा वाघ या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला.
हा कार्यक्रम वेगळा आहे. यावर मी कधीतरी बोलेन, असं म्हणत प्रेक्षकांनाकडून प्रतिप्रश्न पडला असता. त्या म्हणाल्या की, आज सगळ्यांना नाचवा, ऊर्फीला पण घेऊन नाचवा. असं म्हणत त्यांनी छोटीसी प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी हे गाणं फक्त गायलच नाही तर त्याच्या म्युझिक व्हि़डीओमध्ये त्या गाण्यावर थिरकल्यासुद्दा आहेत. त्यामुळे यावरची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे.
Read also
- “चित्रा वाघ यांनी दोन दिवसांत स्पष्टीकरण द्यावं, अन्यथा कारवाई होईल”; उर्फी अन् वाघ यांच्या वादात चाकणकर
- “माझा स्वभाव वाईट, संजय राऊतला सोडणार नाही, त्याच्यावर केस टाकेन”, नारायण राणे भडकले
- राष्ट्रवादीचा भाजपला दणका, स्वराज्यरक्षक संभाजी महाराज नावाचे 10 हजार स्टिकर अजित पवारांच्या हस्ते प्रकाशन
- “त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे….;” बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर
- “तो बोलत राहिला तर त्याला पुर्ण नागडा करीन”; संजय राऊतांचा नारायण राणेंवर संताप