मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई दौऱ्याच्या वेळी वेगवेगळ्या उद्योगपतींशी भेटी घेतल्या. यावरून राज्य सरकारवर कडाडून टिका करण्यात आली. यातच सध्या भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरण गाजतेयं. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
“ते माझा घात अपघात घडवून आणू शकतात”, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी मुंबई दौऱ्यावर राज्यातील अनेक उद्योगपतीशीं त्यांनी भेटी घेतल्या. यातच त्यांचा प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यासोबतचा फोटो ट्विट करत मिटकरींनी राज्य सरकारला डिवचलं आहे. राज्याला उर्फीमध्ये अडकडवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले, असा शाब्दिक टोला मिटकरी यांनी राज्य सरकारला हाणला आहे.
आम्हाला सुप्रिया सुळे नको, अजित पवारच द्या, अन् कार्यकर्त्यांनी केली शरद पवारांकडे मागणी
ऊर्फी जावेद हिच्या कपड्यावरून चित्रा वाघ यांनी आवाज उठवला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून ऊर्फी जावेद देखील आक्रमक होताना दिसत आहे. तर चित्रा वाघ आणि ऊर्फी जावेद यांच्यात इतर राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील उडी घेतली आहे. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळत चालला आहे.
राज्याला उर्फि मध्ये अडकवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फि घेऊन गेले. 😂#योगीतेराखेलनिराला pic.twitter.com/4LabL3poTN
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 6, 2023
Read also
- “नारायण राणे तु माझ्या नादाला लागू नकोस”, ऐकरी उल्लेख करत मागचा पुढचा सर्व संताप राऊतांनी राणेंवर काढला
- अनिल देशमुखांप्रमाणे नवाब मलिक तुरूंगातून बाहेर केव्हा येणार? कार्यकर्त्यांची प्रतिक्षा आणखी वाढली
- “माझा डोळा विरोधी पक्षावर नाही तर त्या चंद्रशेखर बावनकुळेंवर “; भुजबळांनी दिला हा इशारा
- पुढच्या लोकसभेत शिंदे गटाला शुन्य जागा, तर विधानसभेत बोटावर मोजता येतील इतके आमदार
- “आमच्याकडे वाघ परत आले आहेत..! शीतल म्हात्रे, नाशिकमधील 50 पदाधिकारी शिंदे गटात