पुणे : राज्यात मागील काही दिवसापासून छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरून राजकीय वातावरण पेटलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे कधीच धर्मवीर नसते, असं वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्यावर भाजपने अजित पवार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून जोरदार निर्दशने केलीत. तसेच राज्यातील राजकीय नेत्यांनी देखील अजित पवार यांच्यावर टिका केली होती. यातच आज पुण्यात राष्ट्रवादीकडून स्वराज्यरक्षक संभाजी महाराज” या नावाचे १०००० स्टिकर्स तयार करण्यात आले असून ते अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशिक करण्यात आले.
“माझा डोळा विरोधी पक्षावर नाही तर त्या चंद्रशेखर बावनकुळेंवर “; भुजबळांनी दिला हा इशारा
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “स्वराज्यरक्षक संभाजी महाराज” या नावाचे १०००० स्टिकर्स तयार करण्यात आले असून, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वाहनांवर, घरांच्या दरवाजांवर व दुकाने- आस्थापनांवर अशा प्रकारचे स्टिकर्स लावण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांमध्ये स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांच्याबाबत आपली भूमिका रुजविण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. या स्टिकर्सची संकल्पना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रोहन पायगुडे यांची आहे.
पुढच्या लोकसभेत शिंदे गटाला शुन्य जागा, तर विधानसभेत बोटावर मोजता येतील इतके आमदार
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आक्रमकपणे गाजवल्यानंतर टीका -टिप्पणी व काही तुरळक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे पहिल्यांदाच पुणे शहरात दाखल झाल्यानंतर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांच्या घोषणा व जल्लोषाने संपूर्ण वातावरण अजितदादामय झाले होते. “एकच वादा.. अजितदादा…” ,”आम्ही कधीच राजकारण केले नाही धर्मांचे अन् जातीचे.., नेहमी हित पाहिले आहे महाराष्ट्राच्या मातीचे..” अश्या प्रकारच्या घोषणांनी बारामती होस्टेलचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.
“आमच्याकडे वाघ परत आले आहेत..! शीतल म्हात्रे, नाशिकमधील 50 पदाधिकारी शिंदे गटात
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडून महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य करण्याची एक मालिका सुरू आहे, यावेळी पुणे शहर भाजपमधील एकाही पदाधिकाऱ्याने कुठल्याही प्रकारचे आंदोलन केले नाही किंवा साधा निषेधही व्यक्त केला नाही, परंतु छत्रपती संभाजी महाराजांबद्दल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशी भूमिका मांडल्यानंतर शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने अजित पवार यांच्या विरोधात आंदोलने केली यावर अजित पवार यांनी मी छत्रपती संभाजी महाराजांना कोणत्या एका धर्माच्या चौकटीत आणू इच्छित नाही , स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत राहिले, सर्व जातीधर्मीय बांधवांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी लाढणाऱ्या आमच्या वीर योद्धाला “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज” याच नावाने संबोधनार, अशी ठाम भूमिका आदरणीय अजितदादांनी घेतली. या भूमिकेचे स्वागत करत, आदरणीय अजितदादांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज हजारो कार्यकर्त्यांनी बारामती होस्टेल येथे पवार यांचे स्वागत केले.
Read also
- “त्यांनी मला विश्वासात घेतलं नाही, त्यामुळे….;” बच्चू कडूंचा राज्य सरकारला घरचा आहेर
- “तो बोलत राहिला तर त्याला पुर्ण नागडा करीन”; संजय राऊतांचा नारायण राणेंवर संताप
- “राज्याला उर्फीमध्ये अडकडवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले”
- “नारायण राणे तु माझ्या नादाला लागू नकोस”, ऐकरी उल्लेख करत मागचा पुढचा सर्व संताप राऊतांनी राणेंवर काढला
- अनिल देशमुखांप्रमाणे नवाब मलिक तुरूंगातून बाहेर केव्हा येणार? कार्यकर्त्यांची प्रतिक्षा आणखी वाढली