अमरावती : राज्यात आता शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणुक जाहीर करण्यात आली आहे. नाशिक, औरंगाबाद, नागपुर, कोकण शिक्षक या मतदारसंघात ह्या निवडणुकांसाठी मतदान येत्या 30 जानेवारीला होणार आहे. तर 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. तर 4 फेब्रुवारीला मतदानाची सर्व प्रक्रिया पुर्ण होणार आहे. यातच आता प्रहाचे नेते बच्चू कडू यांनी सर्वच्या सर्व जागा लढवणीवार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
पुढच्या लोकसभेत शिंदे गटाला शुन्य जागा, तर विधानसभेत बोटावर मोजता येतील इतके आमदार
30 जानेवारीला ज्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये पाचही विभागात आम्ही उमेदवार देणार आहेत. त्यात मराठवाड्यात संजय तायडे, अमरावती किरण चौधरी, नरेश शंकर कोंडा हे कोकण विभागासाठी उमेदवार आहेत. तसेच अतुल रायकर हे नागपुर तर सुभाष जंगले हे नाशिक विभागातून उभे करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.
“आमच्याकडे वाघ परत आले आहेत..! शीतल म्हात्रे, नाशिकमधील 50 पदाधिकारी शिंदे गटात
पाचही विभागात निष्ठा, मजबूत आणि प्रहार म्हणून उभे करणार आहोत. मला आशा आहे की, यापैकी तिन जागा तरी प्रहारला मिळतील. या सर्वांची कल्पना आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली होती की आम्ही दोन ते तीन वर्षापासून याची तयारी सुरू केली आहे. त्यांना आमचाही विचार करून उमेदवार द्यावा, अशी विनंती केली होती. परंतु त्यांचा काही निरोप आला नाही. त्यामुळे आम्ही आमचे उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही म्हणून आम्ही उमेदवारी टाकतो आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- “तो बोलत राहिला तर त्याला पुर्ण नागडा करीन”; संजय राऊतांचा नारायण राणेंवर संताप
- “राज्याला उर्फीमध्ये अडकडवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले”
- “नारायण राणे तु माझ्या नादाला लागू नकोस”, ऐकरी उल्लेख करत मागचा पुढचा सर्व संताप राऊतांनी राणेंवर काढला
- अनिल देशमुखांप्रमाणे नवाब मलिक तुरूंगातून बाहेर केव्हा येणार? कार्यकर्त्यांची प्रतिक्षा आणखी वाढली
- “माझा डोळा विरोधी पक्षावर नाही तर त्या चंद्रशेखर बावनकुळेंवर “; भुजबळांनी दिला हा इशारा