नाशिक : राज्यात जो बोलेल त्याचा आवाज दाबला जात आहे. त्यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात येत आहे. आपल्याला राज्यघटनेवर आधारित लोकशाही हवी आहे. यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. या देशासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांनी बलिदान दिलं आहे. त्यामुळे आपल्याला या सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे राज्यात महाविकास आघाडीकडे राज्यातील जनतेचा कल आहे. त्यामुळे निवडणूका घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याची आपल्याला आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक गावा गावात तसेच शहरातील प्रत्येक वार्डात आपल्या पक्षाचे संघटन अधिक मजबूत करावे. असं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.
“ज्यांची भीती सत्ताधाऱ्यांना नसते त्यांना कुठेही लघूशंका करण्याची परवानगी मिळते”
येवला मतदासंघांतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक आज येवला संपर्क कार्यालय येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. सर्व सेलाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकारिणी नव्याने तयार करून काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी. ज्यांना काम करायचे नाही त्यांना थांबवून नवीन लोकांना संधी द्या. महिलांनी आपली कार्यकारिणी अतिशय सक्षम करून महिलांची संख्या वाढवावी. मतदासंघांतील प्रत्येक गावात कमिटी तयार करा यामध्ये सर्वांना सामावून घ्या असे सांगत आठ दिवसांनी सर्व सेलची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल .
“येत्या ८ ते १० दिवसात ठाकरे गटातील…”; उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा आणणारी बातमी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक उमेदवार निवडून द्यायची आहे. त्यासाठी येवला मतदासंघांत सुमारे १६६ गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कमिट्या तयार करण्यात याव्यात अशा सूचना केल्या. राज्यात महागाई, शेती, रोजगार, शिक्षण यासह अनेक प्रश्न आपल्या समोर असताना राज्यात मात्र इतर निरर्थक विषयांना अधिक महत्व देऊन चर्चा केली जात आहे अशी टीका केली. ते म्हणाले की, राज्यात महापुरुषांचा अपमान सातत्याने केला जात आहे. या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा देखील काढण्यात आला.
Read also
- “आयोग म्हणजे तुम्ही एकट्या नाहीत, हे लक्षात ठेवा”; चित्रा वाघ रूपाली चाकणकरांवर भडकल्या
- चित्रा वाघ आता गप्प का? त्यांचे तर कपडे सुद्धा..; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “त्यामुळे काहींचं का आकाश पाताळ एक झालं”; अजित पवारांनी त्या वक्तव्यामुळे मागितली माफी
- “नारायण राणे यांचं केंद्रातील केंद्रीय मंत्रीपद लवकरच जाणार”, मोठ्या नेत्याचं भाकित
- अजित पवारांच्या दौऱ्यांत सतर्क रहा, पोलिसांना गृहविभागाच्या सूचना