मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठीच्या निवडणुक कार्यक्रमाची नव्याने आता घोषणा करण्यात आली असून यात दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. यातच निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ठाकरे गटाने दोन उमेदवार लगेचच जाहीर केले आहेत.
पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणुक जाहीर झाल्यानंतर ठाकरे गटाने कामाला सुरूवातही केली आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब यांना उमेदवारी दिली आहे. तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना संधी देण्यात आली आहे. यातच आता दुसऱ्या बाजूला महायुती कोणाला उमेदवारी देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ?
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना जोरदार टोला
मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची घोषणा करण्यात आली आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल येत्या ०१ जूलै रोजी लागणार आहे. यासाठी ३१ मे ते ०७ जुन पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज भरता येणार आहे. तर १० जून रोजी अर्जाची छानणी तर १२ जुनपर्यंत आपला उमेदवारी अर्ज माघे घेता येणार आहे.
दरम्यान, मुंबई पदवीधर मतदारसंघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत ०७ जुलै रोजी संपत आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आधी ड्रायव्हरला आमीष दाखवलं, नंतर धमकावलं,” आरोपीच्या आजोबालाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा..“सध्या उत्तराधिकारीबाबत भाजप पक्षांतर्गत भांडण सुरू”, आता उरले फक्त योगीजी”
हेही वाचा…“घरात जास्त पैसा झाला की रस्त्यावर मस्ती येणारच”, बच्चू कडूंचा संताप
हेही वाचा..पुणे अपघात प्रकरणात दोन पोलिस निरिक्षक निलंबित, पोलिस आयुक्तांची धडक कारवाई