भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोना काळातील उपाययोजना आणि लॉकडाऊन शिथील करण्याबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणीही करत सवाल केला
“कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. यामुळे सर्व ठिकाणी एकदम शिथीलता देणे योग्य राहणार नाही. टप्प्याटप्प्याने शिथीलता देणे गरजेचे आहे,” असे मत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. 10 ते 2 दरम्यान शिथिलता दिली, मग तेव्हा कोरोना होत नाही का? असा प्रश्नही उदयनराजे भोसलेंनी उपस्थित केला.
“शंभर वर्षातून एकदा अशा पद्धतीने कोरोनासारखी परिस्थिती उद्भवते. या परिस्थितीला सामोरे जाण्याकरिता ही एक शिकवण आहे. लॉकडाऊनमुळे लोकांना रोजगार नाहीत. त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे लवकरात लवकर यावर लस निघावी अशी ईश्वराला त्यांनी प्रार्थना केली,” असे उदयनराजे म्हणाले.