मुंबई : उद्धव ठाकरे हे आगामी काही काळात महाराष्ट्र दौरे करणार आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांनी तर दौरे सुरू केले आहेत. परंतु आम्हाला पुर्णपणे खात्री आहे की, केव्हाही राज्यात निवडणुका लागल्या तर शिवसेना प्रचंड संख्येने निवडणून येईल. जे गेले आहेत त्यांचाशिवाय आम्ही शिवसेना उभी करणार असल्याचा निर्धार आम्ही केला आहे. २० जुलै पर्यंत शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर भेटण्यासाठी येत आहेत. त्यानंतर १ ऑगस्टपासून उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र दौरे सुरू करू अशी माहिती देखील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
दिपक केसरकर कोण? कुठे होते? किती वेळा पवार यांच्या गाडीमध्ये बसून फिरत होते?
शिवसेनेचे इतर आमदार विकले गेले असले तरी आजही सेनेचे पदाधिकारी शिवसेना वाढविण्यासाठी भक्कम आहेत. दररोज हजारोच्या संख्येने शिवसैनिक मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहेत. सेनेचे खासदार संजय राऊत असतील किंवा मी राज्याच्या अनेक भागात फिरत असतांना बंडखोर आमदारांबाबत लोकांमध्ये प्रचंड चिड आहे. यामागे भाजपने ज्या पद्धतीने षडयंत्र रचलं. त्याबाबत देखील लोकांना प्रचंड राग आहे. याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. असंही विनायक राऊतांनी म्हटलं आहे.
“आता जमिनीवर राहा, उगाच उडू नका, अन् लायकीत रहा”; निलेश राणेंचा केसरकरांना इशारा
गेल्या अनेक दिवसापासून शिंदे गटातील नेते सेेनेच्या काही खासदारांवर निशाणा साधत आहेत. त्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले की, ज्यांनी शिवसेनेसोबत जे काही पाप केले आहेत. त्या पापाचा खापर कुणावर तरी फोडण्यासाठी ते अशी पद्धतीची वक्तव्ये करीत आहेत. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार यांच्यामधील काही तुंबळ भांडण काही दिवसांनी माहिती पडणार आहे. सगळ्यांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे सर्व जण एकमेकांच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे असंही ते म्हणाले.
मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात शुकशुकाट.! तर फडणवीसांचं काम जोरात
दरम्यान, शिंदे गटात लवकरच बंडखोरी होणार आहे. कारण अतृप्त आत्मे एकत्र आल्यानंतर या गोष्टी घडणार आहेत. त्यांना पुढचा मार्ग दिसला नाही तर ते एकमेकांच्या उरावर बसणार अशी शक्यता देखील विनायक राऊतांनी व्यक्त केली आहे.
Read also
- उद्धव ठाकरेंना शिंदेंचा मोठा धक्का; औरंगाबादसह, उस्मानाबाद नामांतराला स्थगिती
- “ज्या आमदारांना एकनाथ शिंदेंचा फोन जाईल, तो मंत्री बनेल”; अब्दुल सत्तरांचं सुचक वक्तव्य
- “लबाड लांडगे ढोंग करतायत, दिलासा द्यायचं सोंग करतायत”
- शरद पवारसाहेबांनी देखील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा; नवनीत राणांची मागणी
- गुलाल उधळण्यास विलंब होणार; स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांना स्थगिती