मुंबई : महाराष्ट्रामध्ये काल एका दिवसात करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असून, महाराष्ट्रात काल दिवसभरात ६३ हजार ७२९ रुग्णांची नोंद झाली आहे, तर दिवसभरात ३९८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या आकडेवारीमुळे राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, करोना रोगावर गुणकारक असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर होत राज्यात जाणवत असून, रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना देखील समोर येत आहे. यावरून आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात राजकारण सुरू झालेलं पाहायला मिळत आहे.
यातच आज राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिकांनी खळबळजनक दावा करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ट्विट करत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसेच जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली, तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
There are 16 export oriented units in our country that have 20 Lakh vials of #Remdesivir, since exports are now banned by the government, these units are seeking permission to sell this medicine in our country but central government is denying the same. (1/3)
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 17, 2021
राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईन असे अनेक उपाय केले जात आहेत. मात्र तरी देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. परिणामी रेमेडिसिवर इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
The government says it should be sold only through 7 companies that are producing it.
These 7 companies are refusing to take responsibility.
This is a decision making crisis.
While there is a requirement of this medicine and…(2/3)— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 17, 2021
या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ एप्रिलपासून १ मे च्या सकाळपर्यंत (१४४ कलम) संचारबंदीचे आदेश दिले आहेत. तसेच या कडक निर्बंधांचे पालन संपूर्ण राज्यात योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले आहेत.