मुंबई : राज्यात दिवसेंदिवस वेगाने जागतिक महामारीच्या बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या रुग्णसंख्येयमुळे, आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासन, तसेच या महामारीशी संबंधित इतर यंत्रणा आणि संबंधित लोक यांच्यावर प्रचंड प्रमाणात ताण आला आहे.
दुसरीकडे, राज्यात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवाल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. या ऑक्सिजन वायूच्या तुटवड्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सरसावले असून, त्यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या वतीने सर्व साखर कारखान्यांना पत्र पाठवून, राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, यावर नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विट करत टीका केली असून, ‘साहेब आपण काही करू नका, महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाहीत, आधीच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखर कारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील, असा आरोप करत टीका केली आहे.
तसचं, निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर देखील शरसंधान साधले असून, जेव्हा उपमुख्यमंत्री पद जाईल, तेव्हा तुम्हाला आमदारच काय नारळपाणीवाला देखील विचारणार नाही, अश्या शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
साहेब आपण काही करू नका महाराष्ट्राचे डॉक्टर्स व या क्षेत्रातील इंडस्ट्रीज ह्या विषयाचा मार्ग काढतील. तुमचे साखर कारखाने या विषयात जर घुसले तर माणसासाठी हवेतला ऑक्सिजन पण सोडणार नाही. अगोदरच सॅनिटायझर बनवण्याच्या नावाखाली साखरकारखान्यांनी महाराष्ट्राचे पैसे गिळले असतील. https://t.co/6cnJEt7kUm
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 23, 2021