मुंबई : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून शक्ती कायदा आणण्यात आला आहे. आता या कायद्याला त्वरित चालना देण्याची गरज असल्याचे महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. राज्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी रोखण्यासाठी ‘शक्ती कायद्यास’ तात्काळ चालना देण्याची गरज असल्याचे म्हणत त्यांनी यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले आहे.
#महिला तरुणी,अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी लवकर ''शक्ती कायद्यास" तात्काळ चालना देण्याची गरज… ना.डॉ.नीलम गोर्हे
१.पेण येथील बालिका अत्याचार
२ वाकड@pune तरुणीवर लैंगिक अत्याचार
३.सिडको पोलिस ठाणे,संभाजीनगर केस @AnilDeshmukhNCP यांना निवेदन @MahaDGIPR @ShivSena pic.twitter.com/fpGYYu7DkY— Dr Neelam Gorhe (@neelamgorhe) December 30, 2020
निलम गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात पेण, रायगड येथील अत्याचाराच्या घटनांचा, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांचा देखील या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. बलात्कराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीला पॅरोलवर सोडू नये, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘शक्ती कायद्यात’ सायबर गुन्ह्यात देखील आरोपीला कडक कारवाई होण्याबाबत तरतूद केली गेली असली तरी देखील शक्ती कायदा लवकरात लवकर आस्तित्वात येण्यासाठी गृहविभागाकडून तात्काळ कार्यवाही अपेक्षित आहे. काही सामाजिक संस्थांना शक्ती कायद्यात काही उपयोजना सुचव्याचा आहेत. याबाबत सूचना मागविण्यासाठी स्वतंत्र ई-मेल घडण्याची आपणास सूचना करत असून कायद्याबाबत गठीत विधिमंडळाची बैठक लवकर घेण्याची सूचना गोऱ्हे यांनी केली आहे.