मुंबई : ओबीसी आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरून त्याला तीव्र विरोध करू, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर, आता काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.
सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींवर 5 वर्ष अन्याय केला, आणि आता पराभवामुळे त्यांना ओबीसी आठवत असल्याची जोरदार टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 214 ओबीसी तरुणांची केंद्र सरकारने ओपनमधून निवड होवू दिली नाही.त्यावेळी भाजपने सकारात्मक भूमिका घेतली असती तर आज देशात 214 ठिकाणी ओबीसी तरुण जिल्हाधिकारी म्हणून सेवेत रुजू झाले असते. सतत ओबीसी विरोधात भूमिका घेण्याचं काम भाजपने केले आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही म्हणणारे @Dev_Fadnavis यांनी ८ जिल्ह्यात ओबीसीं चे आरक्षण कमी झाले असताना त्यांच्या कार्यकाळात कोणतीही कारवाई केली नाही.एक उपसमिती सुद्धा ज्यांना तेव्हा गठित करता आली नाही त्यांनी आज फक्त भाषणात ओबीसी प्रेम दाखवू नये . @INCMaharashtra
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 13, 2020
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही म्हणणारे फडणवीसांनी यांनी ८ जिल्ह्यात ओबीसीं चे आरक्षण कमी झाले असताना त्यांच्या कार्यकाळात कोणतीही कारवाई केली नाही.एक उपसमिती सुद्धा ज्यांना तेव्हा गठित करता आली नाही त्यांनी आज फक्त भाषणात ओबीसी प्रेम दाखवू नये, असा टोला देखील त्यांनी लगावला.
नागपूर पदवीधर निवडणुकीत ५८ वर्षानंतर झालेल्या पराभवाचा @Dev_Fadnavis व भाजपमधील इतर नेत्यांनी धसका घेतला आहे . सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी वर ५ वर्ष अन्याय केला , आणि आता पराभवामुळे त्यांना ओबीसी आठवत आहे . #Maharashtra
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) December 13, 2020
आज निवडणुकीतील पराभवामुळे ओबीसीसाठी जे प्रेम दाखविण्याचा प्रयत्न करत आहे, ते त्यांनी सत्तेत असताना कृतीत आणायला हवे होते. सत्तेत असताना त्यांनी ओबीसी वर 5 वर्ष अन्याय केला आणि आता पराभवामुळे त्यांना ओबीसी आठवत आहे, अशी सडकून टीका वडेट्टीवार यांनी फडणवीसांवर केली आहे.