सांगली : सांगलीचा निर्णय एकतर्फी होता, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय व्हायला हवा होता. उद्धव ठाकरेंबाबत आम्हाला आदर, परंतु काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना समजून घेऊन जर निर्णय घेतला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे महाविकास आघाडीने या जागेबाबत पुन्हा विचार करावा. अशी कॉंग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्यानंतर विश्वजित कदम आणि विशाल पाटील नॉटरिचेबल झाले. त्यानंतर विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडणुक लढणार का ? अशी चर्चा होती. मात्र आम्ही कॉंग्रेससोबतच आहोत. आघाडीने या जागेबाबत पुन्हा विचार करावा. असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा…“अर्चना पाटलांवर महायुतीच्या तिन्ही पक्षांतील नेतृत्वाचा प्रभाव,” म्हणाल्या.. “माझ्या जडणघडणीत..,”
यावेळी विश्वजित कदम म्हणाले की, सांगलीची जागा ही कॉंग्रेसकडे असावी, कॉंग्रेसनं ती लढावी, ही जागा लढण्यास कॉंग्रेस सक्षम आहे. याठिकाणी २ कॉंग्रेसचे आमदार आहेत. एक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार आहेत. त्याचबरोबर स्थानिक जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे ही जागा कॉंग्रेसला मिळावी, असे आपण नेत्यांना पटवून देत होतो. कोल्हापुरची जागा शाहू छत्रपतींना पंजा चिन्हावर लढायची होती. त्यामुळे ही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला गेली. परंतु ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी सांगलीत जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का, धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश ?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, एखादी बातमी पचनी पडायला वेळ लागतो. काल सांगलीची बातमी कानावर पडली तेव्हा आमची ही परिस्थिती निर्माण झाली. आम्ही कॉंग्रेस पक्षाच्या घटक कार्यकर्त्यांची बोलून जी वस्तूस्थिती समजून घेऊन कॉंग्रेसला ही जागा द्यावी अशी आमची विनंती करतो. येणाऱ्या काळात या जागेबाबत कार्यकर्त्यांची बाजू समजून घेऊन पुढे वाटचाल करू. असेही कदम यांनी सांगितले.
तर येणाऱ्या दिवसांत विशाल पाटील वैयक्तिक पातळीवर कार्यकर्त्यांना भेटतील. कार्यकर्त्यांचा ओढा आमच्याकडे आहे. त्यांच्या मनातील भावना समजून घेणे ही नैतिक जबाबदारी आहे. आमच्या भावना आणि जनेतच्या भावना आम्ही पुढे कॉंग्रेस नेत्यांना सांगू. असेही त्यांनी सांगितले.सत्ताधारी पक्षातील भाजपा सरकारने जो चुकीचा कारभार केलाय त्यांना हद्दपार करायचा आहे. जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून आम्ही भावना मांडतोय. फक्त २४ तास झालेत. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात भेटतायेत. त्यांच्या भावना ऐकून जे काही महाविकास आघाडीचं नैतिक कर्तव्य असेल ते आम्ही पार पाडू. असेही त्यांनी स्पष्ट केलंय.
READ ALSO :
हेही वाचा…मनसेच्या पाठिंब्यामुळे मोहोळांचं मताधिक्य वाढणार, काय सांगतात राजकीय गणितं?
हेही वाचा…शरद पवारांनी बारामतीत डाव टाकला, भाजपचाच ‘हा’ मोठा कार्यकर्ता फोडला