नवी दिल्ली : बाबरी मशीद पतन प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. बाबरी मशिदीचे झालेले पतन हे पूर्वनियोजित नव्हते असे निरीक्षण न्यायालाने आपल्या दोन हजार पानांच्या निकालपत्रान नोंदवले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह इतर सर्व आरोपींची निर्दोश मुक्तता केली आहे. 6 डिसेंबर 1992 ला बाबरी मशिद पाडली गेली या दरम्यान सुरुवातीच्या जिल्हा न्यायालय नंतर अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण विविध टप्प्यावर सुनावणीला आले आहे. मात्र आज याबाबतचा महत्वाचा निर्णय येणार होता. बाबरी मशीद पूर्वनियोजित कट नव्हता असं स्पष्ट मत आज न्यायालयाने व्यक्त केलं आहे.
Today is a sad day in the history of Indian judiciary. Now, the court says there was no conspiracy. Please enlighten me, how many days of months of preparations are required to disqualify an action from being spontaneous?: Asaduddin Owaisi, on the #BabriMasjidDemolitionVerdict pic.twitter.com/iMumkda50l
— ANI (@ANI) September 30, 2020
बाबरी मशीद प्रकरणात लखनऊतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज निकाल दिला आहे.या प्रकरणात ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच,बाबरी मशीद पाडण्याची घटना हा पूर्वनियोजित कट नव्हता, असे निरीक्षण देखील नोंदवले आहे. न्यायालयाच्या निकालानंतर खासदार ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जर मशीद ३२ जणांनी पाडली नाही, तर कुणी पाडली?, असा सवाल ओवेसी उपस्थित केला आहे.सीबीआय न्यायालयानं दिलेला निकाल न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस आहे. ६ डिसेंबरला बाबरी मशीद जादूनं पाडण्यात आली होती का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
“२८ व २९ डिसेंबरच्या रात्री त्या ठिकाणी जादू करून मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या का? राजीव गांधी पंतप्रधान असताना जादूनं कुलूप उघडण्यात आलं होतं का? त्यामुळेच मी म्हणतोय की, सर्वोच्च न्यायालयानं जे म्हटलं होतं, त्याच्याविरोधात हा निकाल आला आहे. जर तुम्ही हिंसा कराल, तर तुम्हाला मिळून जाईल, असं यातून दिसतं. अडवाणींची रथयात्रा भारतात जिथे कुठे गेली, तिथे हिंसा झाली. लोकांच्या हत्या झाल्या. संपत्ती जाळण्यात आली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि आज न्यायालयाचा निकाल येतो की ती घटना स्वयंस्फूर्त नव्हती. मग आम्ही विचारतो की, मग स्वयंस्फूर्त असण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागतो,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.
” एक धक्का और दो, बाबरी मशीद तोड दो, असं उमा भारती म्हणाल्या होत्या, ही गोष्ट खरी नाही का की? बाबरी मशीद पाडली जात असताना मिठाई वाटली जात होती, हे जगानं पाहिलं नाही का? सीबीआयच्या आरोपपत्रात हे म्हटलेलं आहे की, ५ डिसेंबरच्या रात्री आडवणींनी विनय कटियार यांच्या घरात कट रचला. हे खरं नाही का? ,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.
Read Also :
उत्तर प्रदेशमधील घदटनेवर गृहमंत्री तत्काळ ट्विट करतात, महाराष्ट्रातले अत्याचार त्यांना दिसत नाहीत का ? चित्रा वाघ यांचा अनिल देशमुख यांना सवाल https://t.co/KAKx66qyox#ChitraWagh #AnilDeshmukh #BJP #NCP @ChitraKWagh
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 30, 2020