औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल औरंगाबादमधील पाणीपुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरेंनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक कधीपर्यंत उभारले जाणार आहे, याची माहिती दिली.
2025 साली बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक उभारणार आहोत, हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीयत्व सांगणारे हे स्मारक असेल, अशी घोषणा यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक त्यांच्या लाडक्या शहरात होत आहे. नुसता पुतळा नाही उभा करणार. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीमध्ये संभाजीनगरला दिलं ते प्रखर हिंदुत्ववाद, राष्ट्रीयत्व विचार सांगणारे ते स्मारक असेल. "हिंदुत्त्व म्हणजेच राष्ट्रीयत्व" हे नेमकं काय आहे, हे त्यामध्ये कळेल. pic.twitter.com/KsokqFwDH0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 12, 2020
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक त्यांच्या लाडक्या शहरात होत आहे. नुसता पुतळा नाही उभा करणार. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीमध्ये संभाजीनगरला दिलं ते प्रखर हिंदुत्ववाद, राष्ट्रीयत्व विचार सांगणारे ते स्मारक असेल. “हिंदुत्त्व म्हणजेच राष्ट्रीयत्व” हे नेमकं काय आहे, हे त्यामध्ये कळेल, असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. केवळ भूमिपूजन करुन कुदळ मारायला आलेलो नाही. काम पूर्ण करायला आलोय, असेही ते म्हणाले.