राजस्थानमध्ये सत्तासंघर्ष सुरु असतानाच काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसयांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातही सत्तांतरणाच्या हालचाली सुरु झाल्या का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला होता.
मात्र ही राजकीय भेट नव्हती. साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती सांगण्यासाठी भेट घेतली असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले होते. त्यांच्या या स्पष्टीकरणावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली.
मी प्रसारमाध्यमातून ऐकलं की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा राजकीय नव्हता. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा, आमचा विरोधी पक्षनेत्यांवर विश्वास आहे. त्यांनी साखरेच्या विषयावर चर्चा केली असं सांगितलं ते आम्ही सत्य मानतो, असाही टोला अनिल परब यांनी लगावला.