मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाले की, पाकिस्तान आणि त्यांनी निर्माण केलेले दहशतवादीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना घाबरायचे. म्हणायला कमीपणा वाटत असताना बाळासाहेबांनी ‘गर्व से कहो, हम हिंदू है’ अशी घोषणा केली. असंही ते म्हणालेत.
मी आज इथे येत असताना मला खूप गर्दी दिसली. त्या सर्व जनतेमध्ये मला पंचमुखी हनुमान दिसले, श्रीराम, जानकी व लक्ष्मण दिसले, गणपती बाप्पा दिसले. ही सर्व लोकंच आमची कवचकुंडल आहेत. शिवसैनिकांमध्ये आम्हाला बाळासाहेब ठाकरे दिसलेत. शिवसैनिक म्हणजे आमचं कवचकुंडल आहे. कोविड काळात शिवसेनेने खुप काम केलीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करीत आहेत. असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तर शिवसेना हा पक्ष किंवा संघटना नाही तर शिवसेना एक विचार आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणजे आमची तोफ आहे. तर या सभेत अनेकांचा मास्क उतरवण्याचा प्रयत्न शिवप्रमुख करणार आहे. तसेच संजय राऊत हे आज जोरदार बॅटिंग करणार आहेत. असाही टोला देखील लगावला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेत विरोधकांच्या पोटदुखीवर योग्य उपचार होतील, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. अर्थात हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे. त्यावर मला असं वाटतं आजच्या सभेने योग्य उपचार केले जातील, असे म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंगे, हनुमान चालीसा आणि हिंदुत्व यावर राजकीय वाद चालू आहेत. या मुद्द्यांवर आज खुद्ध शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्याचन्हे लक्ष लागून होतं. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलचं पेटून उठलं आहे.