मुंबई : वाईनबाबत घेण्यात आलेल्या निर्णयावरुन चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवरा सुनावलं आहे. यांना काय कळतंय शेतीतलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. शेतकऱ्यांच्या पोराला तुम्हाला दारुच्या नादाला लावायचंय का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. गारपीट झाल्यानंतर शेतकऱ्यांना किती मदत केली? कर्जमाफी तर केली नाही.. यांना शेतीतलं काय कळतंय, असा म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सरकारला टोला लगावला आहे. संजय राऊत यांनाही पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी डिवचलंय. 12 आमदारांच्या राज्यपाल नियुक्तीचा आणि या निर्णयाचा काहीही संबंध नाही. संजय राऊत तुम्ही शपथ देत नाही मुख्यमंत्री आणि आमदारांना.. राज्यपाल हे सर्वोच्च पद घटनात्मकदृष्ट्या मोठं पद आहे.. फुले, शाहू आंबेडकरांचं नाव राऊत प्रत्येक वेळी भाषणात घेतात. पण राऊतांच्या ओठात आंबेडकर आहेत, पण पोटात काय? तर बाबासाहेबांची घटना मान्य नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.
महाविकास आघाडी म्हणजे ‘मद्य विक्री आवडी’ सरकार; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा टोला
बारा आमदारांचं निलबंन रद्द झाल्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसंच सुप्रीम कोर्टाचे आभारदेखील मानले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांना महाविकास आघाडी सरकारवरही सडेतोड शब्दांत टीका केली आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं पुस्तक काढण्यासाठी एकाला कामाला लावलं असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं केलेली कृती ही घटनाबाह्य कृती आहे, असं कोर्टानं म्हटल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
म्हापसा मतदार संघाच्या विकासाचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार – जोशुआ डिसुझा
इतकंच काय निलंबन रद्द केलं नाही, तर लोकशाहीला धोका निर्माण होईल, असं देखील कोर्टानं म्हटलं असल्याचं पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. बहुमत नसलेल्या सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निर्णय असल्याचंही चंद्रकात पाटील यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावले आहे. महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी परीक्षांचे घोटाळे, शेतकऱ्यांची उपेक्षा, आणि आता वाईनबाबत घेण्यात आलेल्या निर्णयावरुनही फटकारलंय.
Read also:
- कोरोनासोबत जगण्यासाठी नवीन नियमावली बनवायला हवी – आरोग्य मंत्री राजेश टोपे
- जामीन नाकारला हा झटका नसून तो दिलासा आहे – निलेश राणे
- केंद्र सरकारकडे ६२५ करोड रुपये पडून आहेत; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- मालाडमधील ‘या’ रस्त्याला दिले टिपू सुलतानाचे नाव; भाजप आमदाराने पाठींबा दिल्यामुळे पक्ष पडला तोंडावर
- आज लोकशाहीचे संरक्षण झाले, १२ आमदारांबद्दलचा निर्णय लोकशाही वाचविणारा – देवेंद्र फडणवीस