मुंबई :कंगनवर सूड उगविण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली का?, दाऊदच्या दोन इमारती पाडण्याचे आदेश आहेत, त्या का नाही पाडल्या. दाऊदला तुम्ही घाबरता का,अशा शब्दात रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सरकारवर केली आहे.
कंगना दोन गोष्टी चुकीच्या बोलली पण तिच्याबद्दल हरामखोर, नॉटी, तुझं थोबाड फोडू असं शिवसेनेच्या नेत्यांकडून विधान केलं जात होत. त्यामुळेच, मुंबईचा नागरिक म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी आपण घेतली. मुंबईत कंगनाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. मुंबईत जवळपास 54 हजार इमारती अशाच अनधिकृत पद्धतीने आहेत. मग, या इमारतींवर कारवाई का नाही, कंगनावर सूड उगविण्याच्या हेतूने ही कारवाई करण्यात आली का?, दाऊदच्या दोन इमारती पाडण्याचे आदेश आहेत, त्या का नाही पाडल्या. दाऊदला तुम्ही घाबरता का, असेही रामदास आठवलेंनी म्हटले.
कंगना गेल्या 16 वर्षांपासून मुंबईत राहते, ती मुंबईकर आहे. कंगनाच्या त्या वक्तव्याशी आम्ही सहमत नव्हतो, पण ही मुंबई आमची आहे, मराठी माणसांची आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे. तसेच, सर्वच जातीच्या, भाषांच्या लोकांचीही ही मुंबई आहे. देशातील सर्वच नागरिकांना रोजगार देण्याचं काम मुंबईनं केलंय. मुंबईने चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय. अमेरिकेपेक्षा आपल्या मुंबईत जागेचे रेट जास्त आहेत. कंगना ही महिला असून तिच्या संरक्षणासाठी तिला पाठिंबा देणं माझी नैतिक जबाबदारी असल्याचं केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं.