अकोला : गेल्या काही दिवसापासून वंचित आणि महाविकास आघाडी युतीची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीसमोर वंचितने प्रत्येकी बारा जागांचा फॉर्म्युला ठरवला आहे. यात दोन आठवड्यात महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा, असंही वंचितने म्हटलं आहे. परंतु अद्यापही वंचितसोबतची युती जाहीर करण्यात आलेली नाही. यावर आता प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याची सर्वांची इच्छा असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मत व्यक्त केलं आहे.
हेही वाचा…गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही”, जरांगे पाटलांचा सरकारला कडक इशारा
दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक झाली. त्या बैठकीत माझ्या शेजारीच काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे बसले होते. त्यावेळी खर्गे यांना वंचितबाबत स्वत: मी सांगितलं की प्रकाश आंबेडकरांची चर्चा करा. ते आपल्यासोबत येण्यास तयार आहेत. परंतु नंतर काय चर्चा झाली माहिती नाही. परंतु वंचितबाबत प्रत्येक जण सकारात्मक आहेत. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी अकोल्यात दिली.
हेही वाचा…“भारत न्याय यात्रा तुम्हाला विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न दाखवणार”, यशोमती ठाकूर यांचं विधान
दरम्यान, महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी वंचितसोबतच्या युतीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. परंतु अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. यातच आता राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे या दोन्ही पक्षांची ताकद स्वबळावर लढण्याची राहिलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीबरोबर प्रत्येकी १२ जागा वाटून घेण्याचे सुत्र ठरवावे अशी मागणी वंचितने केली आहे.
EAD ALSO :
हेही वाचा…“डॉ. पंजाबराव देशमुखांना भारतरत्न पुरस्कार मिळावा,” देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा
हेही वाचा…“मी परत खासदार झालं पाहिजे अशी लोकांची इच्छा”, लोकसभा लढण्याची खैरेंनी व्यक्त केली पुन्हा इच्छा
हेही वाचाअजित पवारांची तक्रार चंद्रकांत पाटलांकडे; जिल्हा नियोजन समितीत मोठा वाद
हेही वाचा…“काकांच्या सवालीत वाढलेल्या अजित पवारांमध्ये बराच फरक”, अजित पवारांना आव्हाडांनी चांगलचं सुनावलं
हेही वाचा…एकाने आमदारकीसाठी तर दुसऱ्याने खासदारकीसाठी पक्षाला ठोकला रामराम..! पवार अन् संजोग वाघेरेंमुळे ठाकरेंना मिळालं बळ