जळगाव : महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सत्तांतरण घडवून आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या 50 आमदारांना घेऊन महाविकास आघाडीतून बाहेर गेल्याने सरकार कोसळलं. अन् राज्यात राजकीय भुकंप घडला. यामागे अनेकांचे हात होते. तसेच शिंदेंना बाहेरूनही पाठिंबा होता. अशा चर्चा त्यानंतर संपुर्ण राज्यात चर्चिल्या येऊ लागल्या. यातच भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
“…तर तुम्ही राज्यसभेचा राजीनामा देणार का?” मुनगंटीवारांचा राऊतांना ओपन चॅलेंज
आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद होता. कारण शिंदे गट बाहेर पडणं हे सोपं नव्हतं. अनेक लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते. नाहीतर हे सगळं विचार करून पाहा सोपं आहे का ? शिवसेनेसारख्या पक्षातून 40 लोकं बाहेर पडत आहेत. उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडत आहेत. त्यांच्या सरकारला कंटाळून बाहेर पडले. मात्र हे लोक आले, एकनाथ शिंदेंच्या पाठीशी उभे राहिले. अनेक लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले आहे.
“आम्ही स्वार्थासाठी मशाल पेटवलेली नाही, आम्ही मुंबईकरांसाठी लढतोय”
आम्हाला वाटलं होतं की काही खरं नाही. मध्येच हे मिशन फेल झालं तर कसं काय होईल. 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं. पण ते सोपं वाटत नव्हतं. कारण पुढारी कसे असतात तुम्हाला माहिती आहे. मात्र सगळे आमच्या पाठीशी उभे राहिले असंही गिरीश महाजन यांनी सांगितले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
Read also
- “कोणी आमदार, खासदार गेले म्हणजे शिवसेना खच्ची झाली हा त्यांचा भ्रम”
- “चाकणकर ताई..! तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारी सोडवा..;” चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर
- “उद्या ठाकरे-शिंदेंचा फैसला होणार, जर असं झालं तर प्रकरण आणखी लांबणीवर”?
- “मला सध्या राजकारणात संधी न देणाऱ्यालाच विचारा”; पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे?
- “शरद पवार उद्या रूग्णालयात दाखल, बाहेर न पडण्याचा डॉक्टरांचा सल्ला”