मुंबई : बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांना हक्काच्या महाराष्ट्रात विलीन करावे यासाठी गुन्हा दाखल झाला तरी सीमा ओलांडून मी बेळगावात आंदोलन केले होते. होय! हा लढा आम्ही जिंकणारच! संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारच! अशी प्रतिक्रिया देत महाराष्ट्राचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कर्नाटक साकारला इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक पोस्ट शेयर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांना हक्काच्या महाराष्ट्रात विलीन करावे यासाठी गुन्हा दाखल झाला तरी सीमा ओलांडून मी बेळगावात आंदोलन केले होते. होय! हा लढा आम्ही जिंकणारच! संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारच! #काळादिवस#बेळगावमहाराष्ट्राचे pic.twitter.com/ctCMoWCod8
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 1, 2020
आज कर्नाटक राज्याचा स्थापना दिन असल्याने महाराष्ट्र सरकारमधील सर्व मंत्री आज काळ्या फिती लावून काम करत आहेत. संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच एक जीआर काढून आम्ही अशा पद्धतीने कर्नाटक सरकारच्या जुलमी कारभाराचा विरोध करणार असल्याचं घोषित केलं होते.
पण आज बेळगाव आणि कारवार चा प्रश्नाला आम्ही पुन्हा पाटलावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं सांगताना राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात बेळगाव आणि कारवार प्रश्नावरून नेहमीच संघर्ष झाल्याचं आपल्याला बघायला मिळाल आहे. अनेकदा सीमावर्ती भागांमध्ये हिंसाचारसुद्धा झाला होता. पण हा प्रश्न नेहमीच महाराष्ट्र राज्य सरकारच्या रडारवर राहिला आहे.
विशेषतः शिवसेना आणि मनसेने हा मुद्दा नेहमीच उचलून धरला होता. पण आता महाराष्ट्र सरकारच्या या कृतीमुळे कर्नाटक सरकार काय प्रतिक्रिया देते अथवा केंद्र सरकार यात हस्तक्षेप करून या दोन्ही राज्यांतील वाद मिरवेल कि याबाबत आणखी काही राजकीय घडामोडी घडतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.