औरंगाबाद : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी ५ जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाची घोषणा केली होती, त्यासाठी गेल्या आठवडाभरापासून तयारीसुद्धा सुरू होती. तर आज सकाळपासून विविध जिल्ह्यातून विविध संघटना आणि मराठी क्रांती मोर्च्याचे कार्यकर्ते बीडकडे निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी मोर्चाला जाणार या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे.
आज सकाळी बिडकीन पोलिसांनी मोर्च्यासाठी निघालेल्या मराठा क्रांती मोर्च्याच्या पदाधिकर्यांना ताब्यात घेतले असून,पोलीस ठाण्यातच स्थानबंद केले आहे. तर बीड जिल्ह्याच्या एन्ट्री पॉइंटवर सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, मोर्चाला येणाऱ्या कार्यकर्त्यांनी अडवलं जात असल्याचं बोलले जात आहे. असं असताना दुसरीकडे मोर्चाला परवानगी नसल्याचं कळतंय. मात्र परवानगी नसली तरीही मराठा मोर्चा निघणारच अशी ठाम भूमिका विनायक मेटे यांनी घेतली आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या मनात मराठा समाजाबद्दल जी गरळ आहे ती काढायची झाल्यास अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा. त्यांना हाकलेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, अशी घोषणाच मेटे यांनी बीडमधून केली आहे. मराठा समाज्या मागण्यांव तातडीने अंमलबजावणी करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्र सरकारने ३ दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल केली. पण महिना उलटून गेला तर राज्य सरकारने काहीही केलं नाही, अशी टीका करताना तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करा, अशी मागणी मेटे यांनी केली आहे.
Read Also :